Maharashtra political Crisis: “व्हिपचं उल्लंघन म्हणजे सदस्यत्व स्वत:हून सोडणे”
maharashtra political crisis supreme court hearing live : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठासमोर सुरू आहे. सुरुवातीला ठाकरे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर शिंदे गट आणि राज्यपालांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला. आता ठाकरे गटाकडून फेरयुक्तिवाद सुरू असून, सुनावणीत ठाकरेंकडून कोणते मुद्दे मांडले जातात, हे महत्त्वाचं आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे राज्यातील सरकार […]
ADVERTISEMENT

maharashtra political crisis supreme court hearing live : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठासमोर सुरू आहे. सुरुवातीला ठाकरे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर शिंदे गट आणि राज्यपालांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला. आता ठाकरे गटाकडून फेरयुक्तिवाद सुरू असून, सुनावणीत ठाकरेंकडून कोणते मुद्दे मांडले जातात, हे महत्त्वाचं आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे राज्यातील सरकार कोसळलं आणि त्यामुळे दुसरं सरकार स्थापन झालं, असा युक्तिवाद शिंदे गटाकडून केला गेला आहे. नबाम रेबिया निकालाचा फेरविचार करण्याची गरज नसल्याचंही शिंदे गटाकडून म्हटलं गेलेलं आहे.
सुप्रीम कोर्टातील सुनावणीचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा
ठाकरे गटाच्या वतीने सिंघवी यांचा युक्तिवाद
कौल आणि मेहतांचा युक्तिवाद पूर्णपणे चुकीचा आहे. कौल,मेहता फक्त व्हीपबद्दल बोलले, राजकीय पक्षावर नाही. व्हीपचं उल्लंघन म्हणजे सदस्यत्व स्वत:हून सोडणे असा अर्थ होतो. पक्षाने तिकीट दिलं म्हणून हे आमदार म्हणून निवडून आले. 10 व्या सूचीच्या आधी आयाराम गयाराम असं सुरू होतं.
फूट,विलिनीकरण, राजीनामा देऊन पुन्हा निवडून येणे अश्या दहाव्या सूचीत तरतूदी आहेत. तुम्हाला स्वातंत्र्य हवं असल्यास राजीनामा देऊन निवडून यावं. तुम्ही राजीनामा दिला नाही,आयोगाकडे गेला नाहीत, तुम्ही थेट उपाध्यक्षांवर अपात्रतेचा ठपका ठेवलात. कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही पक्षविरोधी कारवाया केल्यात?
तुम्ही दहाव्या सूचीतील तरतूदीचंही पालन केलं नाही. 21 जूनला सुरतला जाण्यापेक्षा निवडणूक आयोगाकडे का नाही गेलात. 21 जूनला सुरतला जाण्यापेक्षा निवडणूक आयोगाकडे का नाही गेलात. अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव तुम्ही आणलात. तुम्हाला उपाध्यक्ष अपात्र करतील अशी भिती होती. तुम्ही अपात्रतेला घाबरलात आणि गुवाहाटीला पळालात. चुकीच्या पध्दतीने तुम्हाला अपात्र केलं असतं तर कोर्ट हा पर्याय होता.
Maharashtra Crisis: “भाजपच्या 50 आमदारांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला, तर…”