इलाही जमादार यांचं वयाच्या 75व्या वर्षी निधन

मुंबई तक

मराठी गझल जिवंत ठेवणा-या मोजक्या गझलकारांमध्ये ज्यांचं नाव सुरेश भटांनंतर आवर्जून घेतलं जातं, अशा इलाही जमादार यांचं आज वयाच्या 75व्या वर्षी निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारीच होते. त्यानंतर आज सांगली जवळच्या दूधगाव या आपल्या मुळगावी त्यांना अखेरचा श्वास घेतला. इलाही जमादार यांचा जन्म 1 मार्च 1946 साली सांगतीलीत दुधगावात झाला. 1964 सालापासून काव्यलेखनाला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मराठी गझल जिवंत ठेवणा-या मोजक्या गझलकारांमध्ये ज्यांचं नाव सुरेश भटांनंतर आवर्जून घेतलं जातं, अशा इलाही जमादार यांचं आज वयाच्या 75व्या वर्षी निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारीच होते. त्यानंतर आज सांगली जवळच्या दूधगाव या आपल्या मुळगावी त्यांना अखेरचा श्वास घेतला.

इलाही जमादार यांचा जन्म 1 मार्च 1946 साली सांगतीलीत दुधगावात झाला. 1964 सालापासून काव्यलेखनाला सुरूवात केली. त्यानंतर ते आकाशवाणीत ते सातत्याने काव्यवाचन करत. दूरचित्रवाणीवरच्याही सनक, आखरी इन्तजार अशा काही टेलिफिल्म्सकरिता त्यांनी गीतलेखन केल्याचं सांगितलं जातं. या व्यक्तिरिक्तही काही मराठी आणि हिंदी मालिकांसाठी त्यांनी त्या काळी गीतलेखन केलं. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे ते मान्यताप्राप्त कवी होते.

त्यांच्या दोह्यांबद्दल बोलताना त्यांनी एकदा सांगितलेलं की, त्यांच्या एका मित्राने त्यांना अमृतवाणी नावाच्या कॅसेट भेट दिल्या होत्या, त्यात कबीराचे दोहे होते. त्याच काळात कबीराच्या अनेक रचना वेगवेगळ्या कारणांनी त्यांच्या वाचनात आल्या. त्याचं प्रचंड वाचन त्यांनी तेव्हा केलं. त्यातूनच त्यांनी कबीराचे दोहे मराठीत आणण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वी करून दाखवला. आणि 12 हजारहून अधिक दोह्यांचा संग्रह केला. त्यातलं 225 दोह्यांचं पहिलं पुस्तक त्यांनी अवघ्या 32 दिवसांत पूर्ण केलं. ईलाही यांनी त्यांच्या उत्तर काळात हे दोहे रचले.

हे वाचलं का?

    follow whatsapp