गोवा: ‘फक्त मोदी सरकारच लोकांना सुरक्षा, सन्मान देऊ शकतं’, अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

मुंबई तक

पणजी: गोव्यातील पोंडा येथे एका निवडणूक कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस, टीएमसी आणि आम आदमी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहल्यानंतर अमित शाह म्हणाले की, गोव्याच्या राजकारणात इतके पक्ष का आले आहेत, हे कळत नाही. TMC आणि AAP गोव्याचा विकास करु शकतील का? त्यांना गोव्याबाबत काही […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पणजी: गोव्यातील पोंडा येथे एका निवडणूक कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस, टीएमसी आणि आम आदमी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहल्यानंतर अमित शाह म्हणाले की, गोव्याच्या राजकारणात इतके पक्ष का आले आहेत, हे कळत नाही. TMC आणि AAP गोव्याचा विकास करु शकतील का? त्यांना गोव्याबाबत काही समजतं का?

गृहमंत्री शाह म्हणाले, भाजपच्या राजवटीत अस्थिरता होती आणि लोकांनी आम्हाला 10 वर्षे सत्ता दिली आणि आम्ही विकासाची लाट आणली. आमच्यासाठी गोवा म्हणजे- गोल्डन गोवा आणि काँग्रेससाठी गोव्याचा अर्थ म्हणजे- गांधी कुटुंबीयांचा गोवा… त्यांना सुट्टी घालविण्यासाठी एक पर्यटन स्थळ. कारण त्यांचे नेते खूप सुट्ट्या एन्जॉय करतात.

शाह म्हणाले, ‘दुसरा कोणताही पक्ष गोव्यात सुशासन देऊ शकत नाही. हे पक्ष इथे सरकार बनवू शकत नाहीत, इथे फक्त भाजपच सरकार बनवत आहे. मोदी सरकारचे धोरण असे आहे की, छोट्या राज्यांना अधिक विकास हवा आहे.’

‘गोव्यात अटल सेतू पूल, विमानतळ तेव्हाच बांधता येईल, जेव्हा सीएम सावंत येथून पत्र पाठवतील आणि मोदीजी तातडीने धोरणांना मंजुरी देतील. काँग्रेस विकास करू शकत नाही.’

हे वाचलं का?

    follow whatsapp