समीर वानखेडेंवरील ‘त्या’ आरोपांची होणार चौकशी; विश्वास नांगरे-पाटलांनी काढले आदेश

मुंबई तक

समीर वानखेडे हे नाव सध्या प्रचंड चर्चेत आहे. कारण त्यांनी २ ऑक्टोबरला कॉर्डिलिया क्रूझवर केलेली कारवाई. आर्यन खानला अटक करण्यात आली आणि त्यानंतर NCB आणि समीर वानखेडे या दोहोंची चर्चा सुरू झाली. या सगळ्या प्रकरणात नवाब मलिक यांनी काही आरोप केले होते. ज्या आरोपांमध्ये प्रमुख आरोप होता की ही सगळी कारवाई खोटी आणि बनाव आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

समीर वानखेडे हे नाव सध्या प्रचंड चर्चेत आहे. कारण त्यांनी २ ऑक्टोबरला कॉर्डिलिया क्रूझवर केलेली कारवाई. आर्यन खानला अटक करण्यात आली आणि त्यानंतर NCB आणि समीर वानखेडे या दोहोंची चर्चा सुरू झाली. या सगळ्या प्रकरणात नवाब मलिक यांनी काही आरोप केले होते. ज्या आरोपांमध्ये प्रमुख आरोप होता की ही सगळी कारवाई खोटी आणि बनाव आहे. मात्र या प्रकरणाला ट्विस्ट आला तो प्रभाकर साईलमुळे.

रविवारी प्रभाकर साईलने असा आरोप केला की आर्यन खानला पकडल्यानंतर त्याला सोडण्यासाठी के.पी. गोसावीने शाहरुख खानकडे 25 कोटींची लाच मागितली. एवढंच नाही तर त्यातले आठ कोटी हे समीर वानखेडेंना मिळणार होते. प्रभाकर साईल हा के. पी. गोसावीचा बॉडीगार्ड आणि ड्रग्ज प्रकरणातला साक्षीदार क्रमांक एक आहे. त्याने हे वक्तव्य केल्यानंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं. आता या प्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशी करण्याचं ठरवलं असून चार अधिकारी ही चौकशी करणार आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत हे या चौकशीवर लक्ष ठेवून असणार आहेत. सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हा आदेश दिला आहे.

प्रभाकर साईल हा इतके दिवस समोर आला नव्हता. मात्र रविवारी तो मीडियासमोर आला. तसंच त्याने आपल्याला समीर वानखेडेंपासून जिवाचा धोका आहे असाही आरोप केला. एवढंच नाही तर या प्रकरणातला एक दुसरा साक्षीदारही आज असेच आरोप करतो आहे.

हे वाचलं का?