Shiv Sena विषयीच्या ‘त्या’ वक्तव्याबाबत BJP आमदार प्रसाद लाड यांची पलटी, मीडियावर फोडलं खापर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: भाजपच्या (BJP) माहीम (Mahim) येथील कार्यालयात उद्घाटन करताना आमदार प्रसाद लाड (MLC Prasad Lad) यांनी असं म्हटलं होतं की, ‘वेळ पडली तर शिवसेना भवनही (Shivsena Bhavan) फोडू’ असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मात्र, त्यांच्या या वक्तव्याला काही तास उलटत नाही तोच प्रसाद लाड यांनी त्याचं संपूर्ण खापर हे मीडियावर फोडलं आहे. आपण असं म्हटलोच नव्हतो. माध्यमांनीच माझ्या ‘त्या’ वक्तव्याचा विपर्यास केला आहे. असं आता प्रसाद लाड म्हणत आहेत.

प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अनेक शिवसैनिक देखील आक्रमक झाले होते. शिवसेना नेते सचिन अहिर यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत प्रसाद लाड यांना आव्हान दिलं होतं की, ‘शिवसेना भवन आमच्यासाठी मंदिर आहे. शिवसेना भवनाच्या फुटपाथवर येऊन दाखवावं त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ.’ असं सचिन अहिर म्हणाले होते.

दरम्यान, प्रसाद लाड यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटू लागताच प्रसाद लाड यांनी याप्रकरणाचं खापर मीडियावर फोडंल. मात्र, यावेळी त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रसाद लाड यांनी दिलं स्पष्टीकरण, मीडियावर फोडलं खापर

शिवसेना भवन फोडू या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असं आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. पाहा यावेळी आमदार लाड नेमकं काय-काय म्हणाले.

ADVERTISEMENT

‘आज प्रसारमाध्यमातून माझ्या एका भाषणाचा विपर्यास करुन मी शिवसेना भवन फोडणार अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या. परंतु या गोष्टीचा मी फार स्पष्टपणे स्पष्टीकरण करु इच्छितो की, घाबरण्याचं कुठलंही कारण नाही, जेव्हा-जेव्हा कारे ला आरे होईल तेव्हा आरेला कारेचं उत्तर दिलं जाईल.’

ADVERTISEMENT

‘परंतु, ज्या शिवसेनाप्रमुखांवर आम्ही प्रेम करतो, कोणत्याही पक्षाचे असलो तरीही शिवसेनाप्रमुखांबाबत आम्ही आदर ठेवतो. त्या शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेना भवनाबाबत असं माझ्याकडून देखील कुठलंही चुकीचं वक्तव्य कधी केलं जाणार नाही.’

‘माझं स्पष्टपणे भाषणामध्ये म्हणणं होतं की, आम्ही माहिममध्ये जेव्हा कधी येतो तेव्हा एवढा पोलीस बंदोबस्त ठेवला जातो की, जणू काही आम्ही शिवसेना भवनच फोडायलाच जाणार आहोत. त्या बातमीचा विपर्यास करुन ती जी दाखवली गेली आहे त्यासाठी माझं हे स्पष्टीकरण आहे की, मला कोणत्याही प्रकारे शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनाप्रमुखांनी बांधलेल्या वास्तूचा अनादर करायचा नव्हता. त्यामुळे जर मी कुणाचं मन दुखावलं असेल तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो.’ असं प्रसाद लाड यावेळी म्हणाले आहेत.

पाहा आपल्या भाषणात प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले होते:

‘भाजपची ताकद काय आहे हे २०१४ विधानसभा निवडणुकीत आपण दाखवलंय. कारण, त्यावेळी भाजप होती. भाजपच्या विचारांना मानणारा कार्यकर्ता मतदार होता, तो आज पण भाजपसोबत आहे. त्यात आता सोने पे सुहागा हुआ है. नारायण राणे साहेबांना आणि राणे कुटुंबाला मानणारा स्वाभिमानचा एक मोठा गट राणेंच्या निमित्ताने भाजपात आला आहे.’

‘यामुळे भाजपची ताकद ही निश्चित दुप्पट झाली आहे. नितेशजी पुढच्या वेळेस आपण कार्यकर्ते हे थोडे कमीच आणू. कारण, आपण आलो की पोलिसही खूप येतात. फक्त त्यांना सांगायचं की वर्दी घालून पाठवू नका, म्हणजे हॉलमध्ये बसायला उपयोग होईल. त्यांचं कारण एवढी भीती तुमची आमची की त्यांना वाटतं की हे माहिममध्ये आले म्हणजे शिवसेना भवन फोडणारच. काही घाबरु नका, वेळ आली तर ते देखील करु’, असं लाड म्हणाले होते.

वेळ आली तर Shivsena Bhavan ही तोडू, BJP आमदार प्रसाद लाड यांचं वादग्रस्त वक्तव्य

प्रसाद लाड इथेच थांबले नाही तर यापुढे जाऊन त्यांनी शिवसेनेला थेट आव्हान दिलं होतं की, ‘यापुढे दक्षिण मध्य मुंबईत कोणताही मोर्चा असेल तर तिकडे मला आणि नितेश राणेंना बोलवा. कारण आम्ही आल्यावर तिथे कोणच थांबणार नाही. शिवसेनेच्या कुंडल्या आमच्याकडे आहेत. कुठली नाडी आवळली की कोण टॅहँ करणार हे आम्हाला माहिती आहे’, असं म्हणत लाड यांनी शिवसेनेला चिमटा काढला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT