त्रिपुरात काहीही घडलं नाही, सोशल मीडियावरचं ‘ते’ वृत्त चुकीचं; केंद्रीय गृह मंत्रालयाचं स्पष्टीकरण

मुंबई तक

त्रिपुरातल्या कथित घटनेवरून महाराष्ट्रात दोन दिवस हिंसक आंदोलन सुरू आहे. तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. अमरावती धुमसतं आहे, मालेगावातही बंदला हिंसक वळण लागलं आहे. अशात आता या सगळ्या घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे. अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलं आहे. काय म्हटलं आहे केंद्रीय […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

त्रिपुरातल्या कथित घटनेवरून महाराष्ट्रात दोन दिवस हिंसक आंदोलन सुरू आहे. तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. अमरावती धुमसतं आहे, मालेगावातही बंदला हिंसक वळण लागलं आहे. अशात आता या सगळ्या घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे. अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलं आहे.

काय म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्रालयाने?

त्रिपुरा या ठिकाणी मशिद बांधकामाला कोणतंही नुकसान पोहचलेलं नाही. असा कोणताही प्रकार त्रिपुरात घडलेला नाही. लोकांनी शांतता राखावी. चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. त्रिपुरातील गोमती जिल्ह्यात काकराबन परिसरात एक मशीद पाडण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र ही अफवा आहे आणि पूर्णपणे चुकीची माहिती आहे. दर्गा बाजार परिसरातल्या मशिदीला कोणतंही नुकसान झालेलं नाही. गोमती जिल्ह्यात त्रिपुरा पोलीस शांतता प्रस्थापित करण्याचं काम करत आहेत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात हिंसाचार आणि प्रक्षोभक विधानं सुरू असल्याची माहिती मिळाली. त्रिपुराच्या घटनेवरून महाराष्ट्रातील शांतता आणि सद्भावना बिघडवण्याचं काम केलं. हे सगळं चिंताजनक आहे. कुठल्याही परिस्थितीत शांतता प्रस्थापित होणं गरजेचं आहे अशी आग्रही सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे.