Maratha Reservation: कितीही मोर्चे काढा मराठा आरक्षण मिळणार नाही, तो विषयच संपलाय : गुणरत्न सदावर्ते

मुंबई तक

प्रविण ठाकरे, नाशिक ‘मराठा समाजाने आता कितीही इशारे दिले अथवा मोर्चे काढले तरी आरक्षण मिळणार नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तबच करुन टाकलेलं आहे. अशावेळी मराठा तरुणांनी नेत्यांच्या नादी लागू नये.’ अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोधातील याचिकाकर्ते अॅड गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna Sadavarte) यांनी दिली आहे. ते नाशिकमध्ये (Nashik) पत्रकारांशी बोलत होते. सर्वोच्च […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

प्रविण ठाकरे, नाशिक

‘मराठा समाजाने आता कितीही इशारे दिले अथवा मोर्चे काढले तरी आरक्षण मिळणार नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तबच करुन टाकलेलं आहे. अशावेळी मराठा तरुणांनी नेत्यांच्या नादी लागू नये.’ अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोधातील याचिकाकर्ते अॅड गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna Sadavarte) यांनी दिली आहे. ते नाशिकमध्ये (Nashik) पत्रकारांशी बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण पुन्हा मिळवून द्यावं यासाठी मराठा समाजाकडून सातत्याने मागणी केली जात आहे. यासाठी आता मराठा समाजाकडून (Maratha Community) इशारा देखील दिला जात आहे.

अशावेळी अॅड. सदावर्ते यांना याचबाबत जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा ते असं म्हणाले की, ‘मराठा आरक्षण हा काही आता चर्चेचाच विषय नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करुन टाकलं आहे.’

हे वाचलं का?

    follow whatsapp