लतादीदींच्या स्मारकावरून सुरू झालेलं राजकारण थांबवा, हृदयनाथ मंगेशकर यांचं कळकळीचं आवाहन

मुंबई तक

भारतरत्न लता मंगेशकर यांचं 6 फेब्रुवारीला निधन झालं. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे अवघा देश हळहळला. लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर त्याच दिवशी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादीदींच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी त्या ठिकाणी आली होती. लतादीदींच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

भारतरत्न लता मंगेशकर यांचं 6 फेब्रुवारीला निधन झालं. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे अवघा देश हळहळला. लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर त्याच दिवशी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादीदींच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी त्या ठिकाणी आली होती.

लतादीदींच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 7 फेब्रुवारीला भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. या पत्रात शिवाजी पार्क मैदानावर जिथे लतादीदींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले तिथे त्यांचं स्मारक उभारावं अशी मागणी केली. काँग्रेसनेही अशीच मागणी केली. मनसे आणि वंचित बहुजन आघाडीने या मागणीला विरोध केला आहे. तर शिवसेनेने सावध भूमिका घेतली. या स्मारकावरून वाद निर्माण झाला. अशात आता लतादीदींचे धाकटे भाऊ पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लतादीदींच्या स्मारकावरून सुरू झालेलं राजकारण संपवा. श्रद्धेला श्रद्धांजली वाहायची नसते असं त्यांनी राजकारण करणाऱ्या सगळ्यांनाच सांगितलं आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून नेमका काय वाद सुरू झाला आहे?

काय म्हणाले आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर?

हे वाचलं का?