अनिल देशमुखांविरोधात परमबीर सिंग यांच्याकडे कुठलेच पुरावे नाहीत, जाणून घ्या कसं समोर आलं वास्तव?
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना परमबीर सिंग यांच्या आरोपांमुळे गृहमंत्रीपद सोडावं लागलं. आता मात्र एक नवीच माहिती समोर आली आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे अनिल देशमुखांविरोधात काहीही पुरावे नसल्याचं समोर आलं आहे. परमबीर सिंग यांनी 20 मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून अनिल देशमुखांवर 100 कोटींचं टार्गेट सचिन वाझेला दर महिन्याला वसूल […]
ADVERTISEMENT

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना परमबीर सिंग यांच्या आरोपांमुळे गृहमंत्रीपद सोडावं लागलं. आता मात्र एक नवीच माहिती समोर आली आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे अनिल देशमुखांविरोधात काहीही पुरावे नसल्याचं समोर आलं आहे. परमबीर सिंग यांनी 20 मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून अनिल देशमुखांवर 100 कोटींचं टार्गेट सचिन वाझेला दर महिन्याला वसूल करण्यासाठी दिलं होतं असा आरोप केला होता. त्यामुळे एप्रिल महिन्यात अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद सोडावं लागलं होतं.
परमबीर सिंग यांनी चंदिगढमध्ये एक पॉवर ऑफ अॅटर्नी तयार केली आहे. त्यामध्ये महेश पांचाळ या व्यक्तीला परमबीर सिंग यांचे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. प्रतिज्ञापत्रात पुढे म्हटले आहे की सिंग यांच्याकडे कोणाचेही नेतृत्व किंवा उलटतपासणी करण्याचा कोणताही पुरावा नाही. जी एक सदस्याची समिती नेमण्यात आली आहे त्या समितीसमोर सादर करण्यासाठी परमबीर सिंग यांच्याकडे काहीही नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र सरकारने याच वर्षी मार्च महिन्यात अनिल देशमुख यांच्याविरोधात जे आरोप झाले त्यासाठी चांदीवाल समिती स्थापन केली होती. आयोगाने या प्रकरणी परमबीर सिंग यांना अनेक समन्स धाडण्यात आले होते. मात्र ते हजर राहिले नाही. आयोगाने त्यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंटही काढलं होतं. आयोगासमोर हजर न राहिल्याने परमबीर सिंग यांच्यावर आधी पाच हजारांचा दंड आणि त्यानंतर इतर दोनदा 25-25 हजारांचा दंड असा 55 हजारांचा दंडही लागू केला आहे. आता या प्रकरणी त्यांचं प्रतिज्ञापत्र समोर आलं आहे. या प्रतिज्ञापत्रात हा उल्लेख आहे की परमबीर सिंग यांच्याकडे अनिल देशमुखांविरोधात देण्यासाठी काही पुरावे नाहीत. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेलं एक पत्र सोडलं तर पुरावा म्हणून त्यांच्याकडे काहीही नाही असं यात नमूद कऱण्यात आलं आहे.