गेल्या काही वर्षांपासून CBI च्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह – सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा
केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यापासून केंद्रीय तपासयंत्रणांचा गैरवापर हा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यातील नेत्यांना केंद्रीय तपासयंत्रणांच्या माध्यमातून धमकावलं जात असल्याचा आरोप आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा यांनीही केंद्रीय तपासयंत्रणा सीबीआयची कार्यक्षमता आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह तयार झालेलं असल्याचं महत्वपूर्ण विधान केलं आहे. सत्ता आणि सत्ताधारी हे […]
ADVERTISEMENT

केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यापासून केंद्रीय तपासयंत्रणांचा गैरवापर हा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यातील नेत्यांना केंद्रीय तपासयंत्रणांच्या माध्यमातून धमकावलं जात असल्याचा आरोप आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा यांनीही केंद्रीय तपासयंत्रणा सीबीआयची कार्यक्षमता आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह तयार झालेलं असल्याचं महत्वपूर्ण विधान केलं आहे.
सत्ता आणि सत्ताधारी हे बदलत असतात परंतू एक संस्था म्हणून तुम्ही कायम तिथेच राहणार आहात असं विधान रमण्णा यांनी केलं आहे. ते नवी दिल्ली येथील १९ व्या डी.पी.कोहली स्मृती चर्चासत्रात बोलत होते.
…तर शिवसैनिकाच्या वडापावच्या गाडीवरही ईडी कारवाई करेल, संजय राऊत यांचा खोचक टोला
“राजकीय सत्ता ही कालानुरुप बदलत असते, पण एक संस्था म्हणून तुम्ही कायम तिथेच राहणार आहात. त्यामुळे तुम्ही एक संस्था म्हणून अभेद्य आणि स्वतंत्र राहणं गरजेचं आहे. तुम्ही करत असलेल्या कामाशी एकजुट राहण्याची शपथ घ्या. तुमच्यातला बंधुभाव-एकता हीच तुमची ताकद आहे. सुरुवातीच्या काळात जनतेच्या मनात सीबीआयबद्दल प्रचंड आदर आणि विश्वास होता. परंतू गेल्या काही वर्षांपासून सीबीआयच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे.”









