‘धोका देणाऱ्यांचं राज्य आहे, जो मोठा धोका देणार तो मोठा नेता होणार,’ नाराज बच्चू कडू असं का म्हणाले?

मुंबई तक

मंगळवारी शिंदे आणि फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार झाले. एकूण. 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना पहिल्या विस्तारात स्थान मिळेल, असं वाटत होतं. मात्र, पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान न मिळाल्याने ते नाराज आहेत. असं स्वतः त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याची बच्चू कडूंची कबुली मंत्रिपद न मिळाल्याने […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मंगळवारी शिंदे आणि फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार झाले. एकूण. 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना पहिल्या विस्तारात स्थान मिळेल, असं वाटत होतं. मात्र, पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान न मिळाल्याने ते नाराज आहेत. असं स्वतः त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याची बच्चू कडूंची कबुली

मंत्रिपद न मिळाल्याने आपण नाराज आहात का? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी बच्चू कडू यांना विचारला. या प्रश्नावर बोलताना बच्चू कडू म्हणाले ‘ थोडी नाराजी आहे, नाराजी नाही असं नाही. परंतु इतकीही नाराजी नाही की, शिंदे गट सोडून इतर पक्षात जाणार, अशा स्पष्ट शब्दात बच्चू कडूंनी मंत्रिपद न मिळाल्याच्या प्रश्नावर आपली प्रतिक्रिया दिली. क्षणिक नाराजी आहे, पण अजून पुढचा मंत्रिमंडळ विस्तार बाकी आहे. त्यात जर जागा मिळाली नसती तर वेगळी गोष्ट असती, बच्चू कडू म्हणाले.

‘मंत्रिपदासाठी शिंदे गटात गेलो नाही’ : बच्चू कडू

हे वाचलं का?

    follow whatsapp