नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये देशात अशा घटना घडतील की, आश्चर्य वाटेल -प्रकाश आंबेडकर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्या बोलताना केंद्र सरकार व भाजपवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांनी भारतीय संविधान आणि केंद्राकडून राज्यांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप होत असल्याचा मुद्दा मांडला. मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या या भूमिकेचं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्वागत केलं आहे. त्याचबरोबर देश हुकुमशाहीच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा त्यांनी केला. […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्या बोलताना केंद्र सरकार व भाजपवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांनी भारतीय संविधान आणि केंद्राकडून राज्यांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप होत असल्याचा मुद्दा मांडला. मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या या भूमिकेचं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्वागत केलं आहे. त्याचबरोबर देश हुकुमशाहीच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा त्यांनी केला.
प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोला येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देश हुकुमशाहीच्या वाटेवर असल्याचं मत मांडलं.
संघराज्य पद्धतीचा भंग करण्याचं काम केंद्राकडून होत असल्याच्या उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘हे जुनंच आहे, पण आता सगळ्यांना त्याची जाणीव व्हायला लागली आहे. संविधान बदलणार, नवीन संविधान आलं, तर हुकुमशाही येण्याची शक्यता आहे. त्या हुकुमशाहीला आपण तोंड देऊ शकणार नाही. म्हणून ते आता आपापल्या मतदारांना सांगत आहेत.’
‘मी तर फकिर आहे.. झोळी घेऊन फिरतो’ असे कर्मदरिद्री विचार आमचे नाहीत, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला










