Rajya Sabha Election : उद्धव ठाकरेंच्या बैठकीला बच्चू कडूंची दांडी; मग कुणी लावली हजेरी?
राज्यसभा निवडणुकीची उत्कंठा दिवसेंदिवस वाढत आहे. भाजपविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत असून, दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेकडून बेरजेचं राजकारण सुरू आहे. मात्र, त्यातच आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिवसेनेचं टेन्शन वाढवलं आहे. एवढंच नाही तर त्यांच्याप्रमाणेच अबू आझमी यांनीही त्यात भर घातली आहे. एकीकडे हरभऱ्याच्या अनुदानाच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंनी इशारा दिलाय तर दुसरीकडे अल्पसंख्याक समाजासाठी […]
ADVERTISEMENT

राज्यसभा निवडणुकीची उत्कंठा दिवसेंदिवस वाढत आहे. भाजपविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत असून, दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेकडून बेरजेचं राजकारण सुरू आहे. मात्र, त्यातच आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिवसेनेचं टेन्शन वाढवलं आहे. एवढंच नाही तर त्यांच्याप्रमाणेच अबू आझमी यांनीही त्यात भर घातली आहे.
एकीकडे हरभऱ्याच्या अनुदानाच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंनी इशारा दिलाय तर दुसरीकडे अल्पसंख्याक समाजासाठी काय केलं असा प्रश्न अबू आझमींनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
राज्यसभा निवडणुकीचं वातवरण चांगलंच तापलेलं असताना फोडाफोडी होऊ नये, योग्य ती सगळी खबरदारी घेतली जावी म्हणून मुख्यमंत्र्यांनी आज एक बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवसेनेचे आमदार आणि अपक्ष आमदार होते.
साधारण ५५ आमदारांची या बैठकीला उपस्थिती होती. मात्र बच्चू कडू आणि अबू आझमी हे दोन आमदार या बैठकीला उपस्थित नव्हते ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.