Suhas Kande : ‘कोणत्या चेंबर्समधून दिल्लीत हॉटलाइन सुरू होत्या’; ‘त्या’ मतावरून शिवसेनेचं गंभीर विधान
राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण आणखीनच रंगलं आहे. सुहास कांदे या अपक्ष आमदारांवर दगाबाजीचा आरोप करणाऱ्या शिवसेनेनं आता थेट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केला आहे. शिवसेनेनं सामना अग्रलेखातून राज्यसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना सुहास कांदे यांच्या बाद मताबद्दल प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे. “राज्यसभा निवडणुकीत भाजपने सहावी जागा जिंकली आहे. […]
ADVERTISEMENT

राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण आणखीनच रंगलं आहे. सुहास कांदे या अपक्ष आमदारांवर दगाबाजीचा आरोप करणाऱ्या शिवसेनेनं आता थेट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केला आहे.
शिवसेनेनं सामना अग्रलेखातून राज्यसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना सुहास कांदे यांच्या बाद मताबद्दल प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे.
“राज्यसभा निवडणुकीत भाजपने सहावी जागा जिंकली आहे. या निकालामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. सरकारच्या तंबूत घबराट पसरली, असे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. चार-पाच अपक्ष व वसई-विरारच्या बहुजन विकास आघाडीवाल्यांचे गणित भाजपच्या बाजूने गेले व त्यांचे उमेदवार निसटत्या फरकाने जिंकले.”
“महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकले नाहीत व फडणवीसांचे उमेदवार जिंकले म्हणून राज्यात महाप्रलय तर आला नाही ना? सूर्य पश्चिमेला तर उगवला नाही ना? मुंगीने मेरू पर्वत तर गिळला नाही ना? अरे बाबांनो, तुम्ही मतांचे जुगाड करून जिंकलात, एवढ्यापुरतेच या निकालाचे महत्त्व आहे. या जुगाडबाजीच्या गणितात महाविकास आघाडीस अपयश आले म्हणून जगबुडी तर झाली नाही ना?,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
“शिवसेनेचे सुहास कांदे यांचे मत बाद करण्यात आले. हे एक गौडबंगालच आहे, पण त्याच पद्धतीचा आक्षेप सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदान प्रक्रियेवर घेण्यात आला. निवडणूक आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केले. हे आमच्या निवडणूक आयोगाचे ‘स्वतंत्र’ व ‘निष्पक्ष’ वर्तन मानायचे काय?,” असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे.