राम नवमीदिवशी दुर्दैवी घटना, 35 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू; नेमकं काय झालं होतं?

मुंबई तक

इंदूर : संपूर्ण इंदूर गुरुवारी रामनवमीच्या उत्सवात मग्न झाले होते. शहरातील सर्वात जुन्या भागांपैकी एक असलेल्या स्नेह नगर येथील बेलेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. सकाळचे सुमारे 11:55 वाजले होते. रामजन्मोत्सवासंदर्भात मंदिरात हवन सुरू होते, मात्र लोक आपापल्या जागेवर पूजा करण्यासाठी उभे असताना मोठी दुर्घटना घडली. पायाखालची जमीनच सरकली. लोक सुमारे 50 फूट खोल […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

इंदूर : संपूर्ण इंदूर गुरुवारी रामनवमीच्या उत्सवात मग्न झाले होते. शहरातील सर्वात जुन्या भागांपैकी एक असलेल्या स्नेह नगर येथील बेलेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. सकाळचे सुमारे 11:55 वाजले होते. रामजन्मोत्सवासंदर्भात मंदिरात हवन सुरू होते, मात्र लोक आपापल्या जागेवर पूजा करण्यासाठी उभे असताना मोठी दुर्घटना घडली. पायाखालची जमीनच सरकली. लोक सुमारे 50 फूट खोल खड्ड्यात पडले. (Ram Navami Divas Tragedy, 35 Devotees Killed; What exactly happened?)

Mumbai : लोहार चाळीत पहाटे भंयकर दुर्घटना, 122 जणांची मृत्यूच्या दाढेतून सुटका

नंतर कळले की लोक ज्याला जमीन मानत होते, ती एका विहिरीचे छत होते. मंदिर प्रशासनाने जुनी विहीर न भरता त्यावर लिंटर टाकून झाकण लावले होते. अपघातानंतर मोठ्या प्रमाणात बचावकार्य हाती घेण्यात आले. यामध्ये एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच लष्कराच्या जवानांची मदत घेण्यात आली.

इंदूरचे विभागीय आयुक्त पवन शर्मा यांनी सांगितले की, या अपघातात आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही मदतकार्य सुरू आहे. त्याचवेळी, आतापर्यंत 18 जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांनी सांगितले की, 15 एनडीआरएफ, 50 एसडीआरएफ आणि 75 लष्कराचे जवान बचाव कार्यात सहभागी आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp