RAY : माणसाच्या मनाची काळी बाजू दाखवणारा चित्रानुभव
माणसाचं मन ही मोठी अजब गोष्ट आहे. त्याचा ठाव घेणं कधी कधी खूप सोपं असतं कधी कधी खूप कठीण. प्रत्येक माणसाच्या मनात एक काळी बाजू असतेच असते. कुणी त्याला राक्षसी वृत्ती म्हणतं. कुणी त्याला आणखी काही नाव देतं. पण प्रत्येक माणूस मनात अशी एखादी बाजू बाळगून असतो. आवेगाच्या क्षणी ती बाजू उफाळून येते. त्यातून मग […]
ADVERTISEMENT

माणसाचं मन ही मोठी अजब गोष्ट आहे. त्याचा ठाव घेणं कधी कधी खूप सोपं असतं कधी कधी खूप कठीण. प्रत्येक माणसाच्या मनात एक काळी बाजू असतेच असते. कुणी त्याला राक्षसी वृत्ती म्हणतं. कुणी त्याला आणखी काही नाव देतं. पण प्रत्येक माणूस मनात अशी एखादी बाजू बाळगून असतो. आवेगाच्या क्षणी ती बाजू उफाळून येते. त्यातून मग गुन्हे घडतात. दरवेळी गुन्हा घडायचा म्हणजे तो खूनच व्हायला हवा किंवा दरोडाच पडायला हवा असं नाही. एखाद्या गोष्टीविषयीचा मनात दडवून ठेवलेला राग एखाद्या क्षणी बाहेर येणं हा देखील त्या काळ्या बाजूचाच भाग असतो. सत्यजीत रे यांच्या कथांवर आधारित RAY नावाची वेबसीरिज नेटफ्लिक्सवर रिलिज झाली आहे. ही सीरिजही अशाच चार कथा सांगणारी आहे. या वेबसीरिजमध्ये चार कथा आहेत. या वेब सीरिजचा हा पहिला सिझन आहे. साधारण 54 मिनिटं ते 1 तास असा या प्रत्येक कथेचा कालावधी आहे. माणसच्या मनात दडलेल्या काळ्या बाजूवरच यात भाष्य करण्यात आलं आहे.

‘आप पहले इन्सान नहीं है और आखिरी इन्सान भी नही होंगे जो अपने आप को खुदा, भगवान समझ लेता है और फिर मुँह के बल गिरता है’ असा एक संवाद या सीरिजमध्ये आहे. हा संवाद म्हणजे या सीरिजचं सार आहे असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. या सीरिजमध्ये चार कथा आहेत. ‘Forget Me Not’ ‘हंगामा क्यूँ है बरपा!’ ‘बहुरूपीयाँ’, ‘Spotlight’ अशा या चार कथा आहेत.
पहिली कथा आहे ‘Forget Me Not’ यामध्ये अली फजलने इप्सित रामा नायर हे पात्र साकारलं आहे. श्वेता बसू, अनिंदता बोस आणि श्रुती मेनन यांच्याही यात भूमिका आहेत. इप्सितचं जग हे कॉर्पोरेट विश्व आहे. त्या विश्वात त्याचा लौकिक असा आहे की तो कॉम्प्युटर इतकाच शार्प मेमरी असणारा आहे. त्याच्या आयुष्यात आलेली एक स्त्री त्याला एका घटनेची आठवण करून देते.. आणि ती आठवण करून दिल्यानंतर पुढे काय काय घडतं? याबाबत या कथेत भाष्य करण्यात आलं आहे. इप्सितच्या भूमिकेत अली फजल चपखल बसला आहे. त्याने कॉर्पोरेट विश्वातला त्याचा वावर, तिथे लोकांची वृत्ती कशी असते हे अगदी परफेक्ट दाखवलं आहे. या कथेचा शेवट आपल्याला अनपेक्षित आहे. या कथेत जे काही घडतं ते पाहणं खरंच रंजक ठरतं.










