राज्यपालांचा फक्त २५०-३५० वर्षांपूर्वीचाच नाही, तर ७० वर्षातील इतिहासही कच्चा; रोहित पवार कोश्यारींना असं का म्हणाले?

मुंबई तक

मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किंमत नव्हती. नरेंद्र मोदींच्या जादूमुळे जगात भारतीयांचा गौरव वाढला, असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. त्यांच्या याच विधानावर बोट ठेवतं, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त टोला लगावला आहे. “देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू यांचाही काळ मी पाहिला आहे. मात्र, पहिल्यांदा देशासाठी वीस तास काम करणाऱ्या पंतप्रधान […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किंमत नव्हती. नरेंद्र मोदींच्या जादूमुळे जगात भारतीयांचा गौरव वाढला, असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. त्यांच्या याच विधानावर बोट ठेवतं, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त टोला लगावला आहे.

“देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू यांचाही काळ मी पाहिला आहे. मात्र, पहिल्यांदा देशासाठी वीस तास काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जादूमुळे जगात भारताचा गौरव वाढला आहे. मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किंमत नव्हती. आमच्या प्रथा,परंपरांना लोक नावं ठेवायची”, असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नागपुरात केलं.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावर रोहित पवार काय म्हणाले?

रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानाबद्दल ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणाले आहेत, “राज्यपाल महोदयांचा केवळ २५०-३५० वर्षापूर्वीचा इतिहास कच्चा असल्याचं वाटायचं पण त्यांचं कालचं वक्तव्य बघता मागील ७० वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो. नरेंद्र मोदी हे मोठे नेते असून, देशाच्या प्रगतीत त्यांचा नक्कीच वाटा आहे. पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही केलं नाही, असं नाही.”

“आज कळस दिसत असेल तर त्याचा भक्कम पाया हा आधीच घातला गेलेला आहे आणि त्यात आजपर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांचा वाटा आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. तसंच देश उभारणीत केवळ विशिष्ट नेत्याचंच योगदान असतं असं नाही, तर आपली संस्कृती आणि सर्वच भारतीय नागरिकांचं योगदान तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून ‘आधी भारतीयांना किंमत नव्हती’ असं वक्तव्य घटनात्मक पदावरील व्यक्तीनं करणं ही अत्यंत निंदनीय बाब आहे”, अशी टीका रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली आहे.

रोहित पवारांनी यापूर्वीहीच्या विधानावरूनही राज्यपाल कोश्यारींवर साधला होता निशाणा

काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी गुजराती आणि मारवाडी परत गेले, तर मुंबईत पैसाच राहणार नाही, असं विधान केलं होतं. त्यावरूनही रोहित पवारांनी राज्यपालांनावर टीका केली होती. “महाराष्ट्राला ‘कोरोना स्प्रेडर’ म्हणून संसदेत हिणवलं गेलं आणि २३ हजार कोटींचा एबीजी शिपयार्ड घोटाळा पुढं आला तेंव्हा १४ फेब्रुवारी रोजी फुले दाम्पत्याबाबत राज्यपालांनी कुत्सितपणे वादग्रस्त विधान करुन लोकांचं लक्ष त्या मुद्द्यावरून दुसरीकडं वळवलं.”

हे वाचलं का?

    follow whatsapp