Shiv Sena: “अमित शाह महाराष्ट्राचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू”, ठाकरेंचा घणाघात

मुंबई तक

Uddhav Thackeray hits Out Union Minister Amit Shah : ‘धोका देणाऱ्यांना कधी सोडायचे नसते’, असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात केलं. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर शाह यांनी हे विधान केलं. शाह यांच्या विधानाला उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर दिलं. ‘मिंध्यांना धनुष्यबाणाचे चिन्ह मिळाले ते याच […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Uddhav Thackeray hits Out Union Minister Amit Shah : ‘धोका देणाऱ्यांना कधी सोडायचे नसते’, असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात केलं. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर शाह यांनी हे विधान केलं. शाह यांच्या विधानाला उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर दिलं. ‘मिंध्यांना धनुष्यबाणाचे चिन्ह मिळाले ते याच अमित शहांच्या मेहेरबानीने हे काय आता लपून राहिले?’, असं म्हणत ठाकरेंनी घणाघाती हल्ला केला.

सामना अग्रलेखात ठाकरेंनी काय म्हटलंय?

-“शिवसेना हे नाव व चिन्ह विकत घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाची कमळी पायातले घुंगरू तुटेपर्यंत नाचत आहे. मिंधे गटापेक्षा भाजपलाच आनंदाचे भरते आले आहे. एखाद्या दुकानातून चणे, शेंगदाणे विकत घ्यावेत, अशा पद्धतीने शिवसेना हे नाव आणि चिन्हाबाबतचा ‘निकाल’ विकत घेतला हे आता लपून राहिलेले नाही. एखाद्या प्रॉपर्टीचा सौदा करावा अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने ठाकऱ्यांनी निर्माण केलेली, जोपासलेली शिवसेना दिल्लीचे तळवे चाटणाऱ्या मिंध्यांच्या हातात दिली. शिवजयंतीच्या निमित्ताने गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात आले व त्यांनी मिंध्यांना शिवसेना-धनुष्यबाण मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मिंध्यांना धनुष्यबाणाचे चिन्ह मिळाले ते याच अमित शहांच्या मेहेरबानीने हे काय आता लपून राहिले? हा माणूस महाराष्ट्र व मराठी माणसाचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे. त्यामुळे श्रीमान शहांच्या कच्छपी लागून जे स्वतःचा राजकीय कंडू शमवीत आहेत, त्या सगळ्यांना महाराष्ट्राचे दुष्मन मानावे लागेल.”

-“छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्या स्वराज्याच्या मुळावर आलेल्या प्रत्येक ‘शाह्यां’चा कोथळा छत्रपती व त्यांच्या मावळ्यांनी काढला. छत्रपतींचा तोच विचार घेऊन महाराष्ट्र आजही जिवंत, धगधगत आहे. बेइमान व गद्दारांना शिवाजी महाराजांनी जन्माची अद्दल घडवली हा इतिहास कुणालाच विसरता येत नाही. त्याच शिवरायांचा वारसा शिवसेना सांगते. निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि निवडणूक चिन्हाबाबतचा निकाल मिंध्यांच्या बाजूने दिला तरी शिवसेना ही ठाकऱ्यांचीच होती, आहे व राहील. 40 बेइमान आमदार, 12 खासदार म्हणजे शिवसेना, असा निकाल देऊन लोकभावना व कायद्याचे धिंडवडे काढले गेले. मग लाखो शिवसैनिकांनी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या पुढ्यात त्यांची प्रतिज्ञापत्रे ‘ट्रक’ भरून पाठवली, त्यांना किंमत नाही?”

Shiv Sena: चिन्ह, पक्षानंतर ठाकरेंना आणखी धक्का, ‘या’ दोन गोष्टीही निसटल्या!

हे वाचलं का?

    follow whatsapp