“..तर तुम्ही उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याची टीका केली असती”, असं शिवसेनेने फडणवीसांना का सुनावलं?

मुंबई तक

सुफी संत बाबा ताजुद्दीन यांच्या 100 व्या ऊरूसनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शुभेच्छावरून मोठी चर्चा होताना दिसत आहे. शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी यावरून देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. फडणवीस यांचा शुभेच्छांचा व्हिडीओ पोस्ट करत “हेच जर उद्धव ठाकरेंनी केलं असतं, तर यांनी हिंदुत्व सोडलं, असा अपप्रचार केला असता”, असे ट्वीट मनिषा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

सुफी संत बाबा ताजुद्दीन यांच्या 100 व्या ऊरूसनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शुभेच्छावरून मोठी चर्चा होताना दिसत आहे. शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी यावरून देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. फडणवीस यांचा शुभेच्छांचा व्हिडीओ पोस्ट करत “हेच जर उद्धव ठाकरेंनी केलं असतं, तर यांनी हिंदुत्व सोडलं, असा अपप्रचार केला असता”, असे ट्वीट मनिषा कायंदे यांनी केलं आहे.

मनीषा कायंदे यांनी फडणवीसांना लगावला खोचक टोला

देवेंद्र फडणवीस यांनी सुफी संत बाबा ताजुद्दीन यांच्या 100 व्या उरूस वर्षानिमित्त एक शुभेच्छांचा व्हिडिओ पोस्ट केला होता. यावरून शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. अशा शुभेच्छा उद्धव ठाकरे यांनी दिल्या असत्या तर भाजपने किती अपप्रचार केला असता, असं त्या म्हणाल्या. त्यामुळे फडणवीसांनी दिलेल्या शुभेच्छा आता चर्चेचा विषय ठरत आहे. यावर भाजपकडून काय प्रत्युत्तर येतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

शिवसेनेचं भाजपवर पलटवार

हे वाचलं का?

    follow whatsapp