Narayan Rane पांढऱ्या पायाचे, ते मंत्री झाल्यानेच कोकणावर आपत्ती कोसळली – गुलाबराव पाटील

मुंबई तक

मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीतून राज्य सावरण्याचा प्रयत्न करत असताना एका बाजूला राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे. कोकण दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना ते पांढऱ्या पायाचे असल्याचं म्हटलं. शिवसेनेने या आरोपांना उत्तर देत, राणे हेच पांढऱ्या पायाचे असून ते मंत्री झाल्यामुळे कोकणावर आपत्ती कोसळली असं म्हटलंय. राज्याचे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीतून राज्य सावरण्याचा प्रयत्न करत असताना एका बाजूला राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे. कोकण दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना ते पांढऱ्या पायाचे असल्याचं म्हटलं. शिवसेनेने या आरोपांना उत्तर देत, राणे हेच पांढऱ्या पायाचे असून ते मंत्री झाल्यामुळे कोकणावर आपत्ती कोसळली असं म्हटलंय.

राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी राणेंवर टीका केली आहे. “कोकणासह पश्चिम महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे. त्या आपत्तीतून सावरण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असून, विरोधकांनी यामध्ये राजकारण करण्याची गरज नाही. मात्र, केंद्रीय मंत्री नारायण राणे या आपत्तीतही राजकारण करत आहेत. नारायण राणे हे पांढऱ्या पायाचे आहेत. ते मंत्री झाल्यामुळेच कोकणावर ही आपत्ती कोसळली आहे”.

Chiplun Flood : मुख्यमंत्री पांढऱ्या पायाचे ! ते आले आणि वादळं आली…राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

जाणून घ्या काय म्हणाले होते नारायण राणे?