भाजपचे नेते उठसुट तुरुंगात टाकण्याच्या धमक्या देतात, तुरुंगाचे खासगीकरण झालं आहे का?-संजय राऊत

मुंबई तक

महाराष्ट्रातले भाजपचे नेते महागाईवर बोलत नाहीत. पेट्रोल पाच रूपयांनी कमी झालं आहे म्हणून बागडत आहेत. पण पाच रूपये कमी करूनही पेट्रोल आणि डिझेलने शंभरी ओलांडलेलीच आहे. एवढंच नाही तर भाजपचे नेते रोज सकाळी उठून याला तुरूंगात टाकणार, त्याला तुरुंगात टाकणार असे धमकावत असतात. देशातल्या सरकारी कंपन्या तर केंद्राने विकल्या, अनेक उपक्रमांचं खासगीकरण केलं. तसंच आता […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रातले भाजपचे नेते महागाईवर बोलत नाहीत. पेट्रोल पाच रूपयांनी कमी झालं आहे म्हणून बागडत आहेत. पण पाच रूपये कमी करूनही पेट्रोल आणि डिझेलने शंभरी ओलांडलेलीच आहे. एवढंच नाही तर भाजपचे नेते रोज सकाळी उठून याला तुरूंगात टाकणार, त्याला तुरुंगात टाकणार असे धमकावत असतात. देशातल्या सरकारी कंपन्या तर केंद्राने विकल्या, अनेक उपक्रमांचं खासगीकरण केलं. तसंच आता तुरुंगाचं खासगीकरण झालं आहे का? असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोकमधून विचारला आहे.

काय म्हणालेत संजय राऊत?

देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांना दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असे आव्हान दिलं. तर दिवाळी संपण्याची वाट कशाला बघता आत्ताच बॉम्ब फोडा असं प्रतिआव्हान मलिक यांनी दिलं. दिवाळी संपली तरीही आरोप-प्रत्यारोपांचे फटाके फुटतच राहतील. भाजपला कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचं सरकार घालवायचं आहे. सरकार घालवण्याची ही अलोकशाही पद्धत कोणती?

हे वाचलं का?

    follow whatsapp