राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, सरकारने जाहीर केली नवी नियमावली
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली चिंताजनक वाढ पाहता राज्य सरकारने रविवारी रात्रीपासून संचारबंदीची घोषणा केली आहे. मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक आणि इतर महत्वाच्या शहरांमध्ये प्रत्येक दिवशी रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. ही वाढ पाहता राज्यातली आरोग्यव्यवस्था कमी पडेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं चिंताजनक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटच्या […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली चिंताजनक वाढ पाहता राज्य सरकारने रविवारी रात्रीपासून संचारबंदीची घोषणा केली आहे. मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक आणि इतर महत्वाच्या शहरांमध्ये प्रत्येक दिवशी रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. ही वाढ पाहता राज्यातली आरोग्यव्यवस्था कमी पडेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं चिंताजनक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटच्या बैठकीत केलं होतं. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मिशन बिगीन उपक्रमाअंतर्गत नवी नियमावली जाहीर केली आहे.
नागपुरात Corona चा कहर, २४ तासात ५४ रूग्णांचा मृत्यू
फेस मास्क –
सार्वजनिक ठिकाणी वावरताना किंवा प्रवासादरम्यान मास्कचा वापर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.










