Supreme court: केंद्र सरकारला सुप्रीम झटका, ताशेरे ओढत ‘या’ चॅनेलवरचे आरोप ठरवले चुकीचे!

मुंबई तक

मल्याळम वृत्तवाहिनी MediaOne च्या प्रसारण परवान्याचे नूतनीकरण करण्यास केंद्राने दिलेला नकार ही बाब चुकीचे असल्याचं म्हणत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

ADVERTISEMENT

supreme court quashes centres ban on mediaone rejects
supreme court quashes centres ban on mediaone rejects
google news

नवी दिल्ली: राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव मल्याळम वृत्तवाहिनी (News Channel) MediaOne च्या प्रसारण परवान्याचे नूतनीकरण करण्यास केंद्राने दिला होता. ज्या विरोधात या चॅनलने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली होती. याच प्रकरणी काल (बुधवार) कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. केंद्र सरकारने परवान्यासाठी दिलेला नकार हा चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. (supreme court quashes centres ban on mediaone rejects home ministrys national security rationale in sealed envelope)

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने चॅनेलच्या काही प्रसारणामुळे राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम होत असल्याचा केंद्र सरकारचा युक्तिवाद फेटाळून लावला.

कोर्टाने केंद्र सरकारला सुनावले खडे बोल

कोर्टाने याबाबत निरीक्षण नोंदवताना म्हटलं आहे की, “आयबीने काही अहवाल सादर केले आहेत. ज्या अहवालात असं म्हटलं आहे की, अल्पसंख्याकांच्या बाजूने रिपोर्ट प्रसारित करण्यात आले आहेत. UAPA, NRC, CAA आणि न्यायपालिका आणि कार्यपालिकेवर टीका करणारे अहवाल प्रसारित केले गेले आहेत. असे अहवाल सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा केवळ अंदाज आहे. यात दहशतवाद संबंधित बाबी नाहीत.’

यावेळी कोर्टाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले असून असंही म्हटलं आहे की, ‘राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम होत असल्याचे दावे केवळ हवेत केले जाऊ शकत नाहीत.’

हे वाचलं का?