काश्मिरात दहशतवाद्यांचा हैदोस! पाणीपुरीवाल्यासह कारपेंटरची गोळ्या घालून हत्या

मुंबई तक

काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हैदोस घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केलं जात असून, शनिवारी पुन्हा एकदा दोन परप्रांतीय नागरिकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पुलवामा आणि श्रीनगरमध्ये या घटना घडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून सामान्य माणसांना निशाणा बनलवं जात आहे. दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढल्यानंतर लष्कराने दहशतवादविरोधी मोहिमेला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हैदोस घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केलं जात असून, शनिवारी पुन्हा एकदा दोन परप्रांतीय नागरिकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पुलवामा आणि श्रीनगरमध्ये या घटना घडल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून सामान्य माणसांना निशाणा बनलवं जात आहे. दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढल्यानंतर लष्कराने दहशतवादविरोधी मोहिमेला गती दिली असून, दहशतवाद्यांसोबत चकमकीही झडल्या आहेत.

दुसरीकडे दहशतवाद्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केलं जाण्याच्या घटना सुरूच आहेत. काश्मीर परिक्षेत्राच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी परप्रांतीय नागरिकांची हत्या केली आहे.

श्रीनगरमधील ईदगाह परिसरात शनिवारी सायंकाळी 6.40 वाजता अरविंद कुमार या पाणीपुरी विक्रेत्यावर हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 36 वर्षीय अरविंद कुमार यांचा मृत्यू झाला.

हे वाचलं का?

    follow whatsapp