Sanjay Raut: देशाचं राजकारण प्रादेशिक पक्षांच्या करंगळीवर उभं आहे, हे श्रेय शिवसेनेचं
देशाचं राजकारण हे प्रादेशिक पक्षाच्या करंगळीवर उभं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी लेखणी, कुंचला आणि वाणीच्या सहाय्याने शिवसेना उभी केली. त्यावेळी त्यांच्यावर प्रांतीयवादी असा शिक्का मारण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेना उदयास आली. त्या शिवसेनेला ५६ वर्षे पूर्ण झाली आहेत. शिवसेना स्थापन झाल्यावर देशभरातल्या विविध राज्यात प्रादेशिक पक्ष स्थापन झाले. हे पक्ष भूमिपुत्रांचे […]
ADVERTISEMENT

देशाचं राजकारण हे प्रादेशिक पक्षाच्या करंगळीवर उभं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी लेखणी, कुंचला आणि वाणीच्या सहाय्याने शिवसेना उभी केली. त्यावेळी त्यांच्यावर प्रांतीयवादी असा शिक्का मारण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेना उदयास आली. त्या शिवसेनेला ५६ वर्षे पूर्ण झाली आहेत. शिवसेना स्थापन झाल्यावर देशभरातल्या विविध राज्यात प्रादेशिक पक्ष स्थापन झाले. हे पक्ष भूमिपुत्रांचे प्रश्न मांडत राहिले असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
आणखी काय म्हणाले संजय राऊत?
सध्याचं देशातलं राजकारण हे प्रादेशिक पक्षांच्या करंगळीवर उभं आहे. याचं श्रेय बाळासाहेब ठाकरेंनाच जातं. सोमवारी विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे. त्याबाबतही संजय राऊत यांनी भाष्य केलं. आमच्या मतांवर दरोडा पडू नये म्हणून आमदारांना आम्ही हॉटेलमध्ये ठेवलं आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच काही वेळात उद्धव ठाकरे हे हॉटेलमध्ये येतील आणि कार्यकर्ते तसंच पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Agneepath Scheme : ठेकेदारीवर गुलामांना ठेवलं जातं, लष्कराला नाही; संजय राऊत भडकले