चंद्रपूर जिल्ह्यात महिन्याभरात तिसऱ्यांदा पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला

मुंबई तक

चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीमुळे पूर आले आहे. गेल्या महिन्याभरात चंद्रपूरमध्ये तिसऱ्यांदा पूर आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक घरात पाणी शिरले असून काही नद्यांना पूर आल्याने गावांचे संपर्क तुटले आहे. प्रशासनाकडून मदतकार्य सुरु आहे. एका महिन्यात तिसऱ्यांदा नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिकांना आपले घर सोडून सुरक्षितस्थळी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीमुळे पूर आले आहे. गेल्या महिन्याभरात चंद्रपूरमध्ये तिसऱ्यांदा पूर आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक घरात पाणी शिरले असून काही नद्यांना पूर आल्याने गावांचे संपर्क तुटले आहे. प्रशासनाकडून मदतकार्य सुरु आहे. एका महिन्यात तिसऱ्यांदा नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिकांना आपले घर सोडून सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

धरणाचे दरवाजे उघडल्याने नद्यांना पूर

गेल्या दोन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आले आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अप्पर वर्धा, लोअर वर्धा, गोसीखुर्द धरण आणि ईराई धरण ओव्हरफ्लो झाले होते. त्यामुळे या धरणांचे दरवाजे उघडण्यात आल्याने परिसरातील नद्या-नाल्याना पूर आले आहे. वर्धा, वैनगंगा आणि ईराइ नदीला पूर आले आहे. तिसऱ्यांदा धरणाचे दरवाजे उघडल्याने पुराचा सामना करावा लागत आहे. धरणात पाणी वाढत असल्याने परिस्थिती बिकट होत चालली आहे.

अनेक गावांचे संपर्क तुटले