मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक; कळंब शहरात हजारोंच्या संख्येत काढण्यात आला मोर्चा

मुंबई तक

मराठा समाजाकडून पुन्हा एकदा आरक्षणासाठी एल्गार पुकारण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून शांत असलेला मराठा समाज पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी सक्रिय झालेला पहायला मिळत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहरामध्ये दुसऱ्या पर्वाचा राज्यातील पहिला महामोर्चा पुकारण्यात आला होता. सोमवारी हजारोच्या संख्येत कळंब शहरामध्ये मराठा समाजातील महिला, वृद्ध, लहान मुलं यांसह विद्यार्थी देखील मोठ्या संख्येत रस्त्यावर उतरले […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मराठा समाजाकडून पुन्हा एकदा आरक्षणासाठी एल्गार पुकारण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून शांत असलेला मराठा समाज पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी सक्रिय झालेला पहायला मिळत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहरामध्ये दुसऱ्या पर्वाचा राज्यातील पहिला महामोर्चा पुकारण्यात आला होता. सोमवारी हजारोच्या संख्येत कळंब शहरामध्ये मराठा समाजातील महिला, वृद्ध, लहान मुलं यांसह विद्यार्थी देखील मोठ्या संख्येत रस्त्यावर उतरले होते. मराठा समाजातील वकील, डॉक्टर यांसह इतर क्षेत्रातीलmमान्यवर मंडळी देखील सहभागी झाले होते.

महिलांची संख्या लक्षणीय

मराठा समाजाने विविध मागण्यासाठी जवळपास 58 मूक मोर्चे काढले होते. 9 ऑगस्ट 2017 रोजी मुंबईत शेवटचा मोर्चा निघाला होता. मात्र त्यानंतर अद्यापपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही. त्यामुळे मराठा समाज आता आक्रमक भूमिकेत दिसत आहे. सोमवारी पार पडलेल्या महामोर्च्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. विद्यार्थिनी, महिला या मोर्च्यात पुढे चालत होते. पाऊस पडत असला तरी एक मराठा लाख मराठा म्हणत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

हे वाचलं का?

    follow whatsapp