S Y Quraishi : ‘दोन गोष्टींवरून निवडणूक आयोग ठरवणार शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची?’
एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह पक्षाविरोधात बंड केलं. बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. शिंदे समर्थक आमदारांच्या गटाने आणि भाजपने राज्यात सरकार स्थापन केली. पण आता लढाई सुरूये शिवसेना कुणाची? S Y Quraishi यांनी याबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे. आमदार आणि खासदार आपल्या बाजूने असल्याचं सांगत एकनाथ शिंदे आपणच खरी शिवसेना असल्याचं सांगत आहेत, दुसरीकडे पक्षाच्या […]
ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह पक्षाविरोधात बंड केलं. बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. शिंदे समर्थक आमदारांच्या गटाने आणि भाजपने राज्यात सरकार स्थापन केली. पण आता लढाई सुरूये शिवसेना कुणाची? S Y Quraishi यांनी याबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे.
आमदार आणि खासदार आपल्या बाजूने असल्याचं सांगत एकनाथ शिंदे आपणच खरी शिवसेना असल्याचं सांगत आहेत, दुसरीकडे पक्षाच्या घटनेचा हवाला देत शिवसेना उद्धव ठाकरेंचीच असल्याचं दावा केला जातोय. हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात पोहोचला आहे. याच तिढ्यावर निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी महत्त्वाचं भाष्य केलंय.
माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत निवडणूक आयोग कशाच्या आधारे निकाल देईल याबद्दल सांगितलं आहे.
पक्षात दोन गट पडल्यानंतर निवडणूक आयोग कोणत्या मापदंडांवर मुख्य पक्ष ठरवतो? या मुद्द्यावर बोलताना कुरेशी म्हणाले, “पक्षातील गटबाजीनंतर निवडणूक आयोग दोन्ही बाजूंच्या दाव्यांची तपासणी करून दोन बाबींवर निर्णय घेतो. पहिली गोष्ट म्हणजे कोणत्या गटाकडे आमदार आणि खासदारांचे बहुमत आहे. दुसरी गोष्ट, पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत कोणाच्या बाजूने बहुमत आहे. दोन्ही पक्षांचे दावे या दोन तराजूवर तोलले जातात. पक्ष रचनेत आमदार-खासदारांसह कोणत्या गटाला बहुमत आहे हेही आयोग पाहतो. निवडणूक आयोग दोन्ही पक्षांच्या दाव्यांना बहुमताचे तत्त्व लागू करून ‘मुख्य पक्ष’ म्हणून गट घोषित करण्याचा निर्णय घेतो,” असं ते म्हणाले.