सुषमा अंधारेंविरुद्ध निषेध यात्रा! वारकऱ्यांकडून ‘ठाणे बंद’ची हाक
हिंदू धर्मातील देवी-देवता आणि संतांबद्दल सुषमा अंधारे यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या विधानांवरून महाराष्ट्रात सध्या वाद निर्माण झालाय. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध काही वारकरी संघटना आक्रमक झाल्या असून, ठाण्यात शनिवारी (17 डिसेंबर) निषेध यात्रा काढण्यात येणार आहे. यानिमित्ताने वारकऱ्यांनी ठाणे बंदची हाक दिलीये. ‘हिंदुत्व संपवण्याचा विडा उलचलेल्ल्या निर्बुद्ध बाईने छळ मांडला आहे,’ […]
ADVERTISEMENT

हिंदू धर्मातील देवी-देवता आणि संतांबद्दल सुषमा अंधारे यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या विधानांवरून महाराष्ट्रात सध्या वाद निर्माण झालाय. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध काही वारकरी संघटना आक्रमक झाल्या असून, ठाण्यात शनिवारी (17 डिसेंबर) निषेध यात्रा काढण्यात येणार आहे. यानिमित्ताने वारकऱ्यांनी ठाणे बंदची हाक दिलीये.
‘हिंदुत्व संपवण्याचा विडा उलचलेल्ल्या निर्बुद्ध बाईने छळ मांडला आहे,’ असा आरोप करत वारकरी संघटना सुषमा अंधारेंविरुद्ध आक्रमक झाल्या आहेत. सुषमा अंधारे यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी उद्या (17 डिसेंबर) मोर्चा देखील काढण्यात येणार आहे. असं असलं तरी निषेध यात्रा करणाऱ्या वारकऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबद्दलच्या आक्षेपार्ह विधानांवर बोलण्यास चुप्पी साधली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे या गेल्या काही दिवसांपासून वादात अडकल्या आहेत. सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यावरून आता ठाण्यातील वारकरी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. वारकरी संघटनांना जैन धर्मीय, हिंदुत्ववादी संघटना आणि धार्मिक सामाजिक संस्थांनीही पाठिंबा दिला आहे.
महाविकास आघाडीच्या ‘महामोर्चा’ला 13 अटींसह परवानगी, काय म्हटलंय आदेशात?