२०१४ ला शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत येणार होती का? शरद पवारांनीच दिलं उत्तर

मुंबई तक

काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण यांनी एक दावा करून खळबळ उडवून दिली होती. अशोक चव्हाण यांनी असं म्हटलं होतं की २०१४ ला शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते. त्यावेळी शिवसेनेकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडीचा प्रस्ताव दिला होता. जे शिष्टमंडळ आलं होतं त्यात एकनाथ शिंदे होते असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण यांनी एक दावा करून खळबळ उडवून दिली होती. अशोक चव्हाण यांनी असं म्हटलं होतं की २०१४ ला शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते. त्यावेळी शिवसेनेकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडीचा प्रस्ताव दिला होता.

जे शिष्टमंडळ आलं होतं त्यात एकनाथ शिंदे होते असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. मात्र शरद पवार यांना याबाबत विचारण्यात आलं. शिवसेना २०१४ लाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत येणार होती का? या प्रश्नाचं उत्तर शरद पवारांनीच दिलं आहे.

काय म्हटलं आहे शरद पवार यांनी?

२०१४ ला शिवसेनेसोबतच्या सरकारचा कुठलाही प्रस्ताव असता तर मला समजलं असतं. अशोक चव्हाण काही बोलल्याचं मला तरी माहिती नाही. असं उत्तर शरद पवारांनी दिलं आहे. त्यामुळे शरद पवारांनी म्हटल्यानुसार २०१४ ला असा काही प्रस्ताव आला नव्हता. कारण तसा प्रस्ताव असता तर त्यावेळी त्यांना ते कळलं असतं.

आणखी काय म्हणाले आहेत शरद पवार?

“आमच्याकडे कोणी प्रस्ताव दिला नाही. राष्ट्रवादीला जर कोणी प्रस्ताव दिला असेल तर मला थोडफार तरी माहीत असेल. राष्ट्रवादीचे सगळे निर्णय घेण्याचा आमच्या अन्य लोकांना अधिकार आहे परंतु तरीही ते माझ्या कानावर घालतात. अशोक चव्हाण जे बोलले ते मी कधीही ऐकलं नाही.” असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp