जाणून घ्या पाचही राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल कधी होणार जाहीर?

मुंबई तक

मुंबई: पाच राज्यापैकी चार राज्याच्या निवडणुका या पार पडल्या आहेत. पण उत्तर प्रदेशमधीसल विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान आज (7 मार्च) संपणार आहे. या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 10 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होतं. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 7 टप्प्यातील शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीची मतमोजणी 10 मार्च रोजी होणार आहे. अशा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: पाच राज्यापैकी चार राज्याच्या निवडणुका या पार पडल्या आहेत. पण उत्तर प्रदेशमधीसल विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान आज (7 मार्च) संपणार आहे. या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 10 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होतं. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 7 टप्प्यातील शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीची मतमोजणी 10 मार्च रोजी होणार आहे. अशा स्थितीत आता मतदानादरम्यान सर्वच राज्याचा नेमता एक्झिट पोल काय असणार याकडेच आता अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.

निवडणुकीचा निकाल हा 10 मार्च जाहीर होणार आहे. पण त्याआधी आता सर्व एक्झिट पोलची आकडेवारी आज संध्याकाळी साडे सहा वाजेनंतर समोर येईल. ज्यावरून या पाचही राज्यातील जनतेने निवडणुकीत नेमका कौल कोणाला दिला आहे याचा एक सरासरी अंदाज समोर येईल अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला एक्झिट पोलशी संबंधित काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहोत.

एक्झिट पोल म्हणजे काय?

मतदान केल्यानंतर मतदान केंद्राबाहेर आलेल्या मतदाराशी बोलून एक्झिट पोल तयार केला जातो. मतदाराला विचारले जाते की त्याने कोणाला मतदान केले. प्रत्येक मोठ्या निवडणुकीत, अनेक एजन्सी आणि मीडिया हाऊस त्यांच्या स्वत:चा एक्झिट पोल डेटा जारी करतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp