महाराष्ट्रात शाळा पुन्हा कधी सुरू होणार? राजेश टोपे यांनी दिलं उत्तर, म्हणाले….

मुंबई तक

कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन या दोन्ही व्हेरिएंट्सचे रूग्ण वाढू लागले. त्यामुळे राज्यातल्या शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा बंद करण्याच्या या निर्णयाला अनेकांनी विरोधही दर्शवला आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. काय म्हणाले आहेत राजेश टोपे? ‘शाळा सुरू करण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह असून याबाबत 15 दिवसांनी परिस्थिती […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन या दोन्ही व्हेरिएंट्सचे रूग्ण वाढू लागले. त्यामुळे राज्यातल्या शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा बंद करण्याच्या या निर्णयाला अनेकांनी विरोधही दर्शवला आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

काय म्हणाले आहेत राजेश टोपे?

‘शाळा सुरू करण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह असून याबाबत 15 दिवसांनी परिस्थिती पाहून पुनर्विचार केला जाईल. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण कमी असल्याने अनेकांनी शाळा सुरू करण्याची मागणी आहे. याबाबत 15 दिवसांचा अंदाज घेऊन मुख्यमंत्र्यांच्या विचाराने निर्णय घेतला जाईल असेही टोपे म्हणाले.’

हे वाचलं का?

    follow whatsapp