पुण्यातील तरुणाईला गुंडांचं आकर्षण का वाटतंय?
पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या सुटकेनंतर जी मिरवणूक काढण्यात आली आणि ज्या पद्धतीने त्याच्या समर्थकांनी पुण्यापर्यंत जो धुडगूस घातला या सगळ्याच गोष्ट अशोभनीय अशाच आहेत. पण यामुळे काही महत्त्वाचे आणि अत्यंत चिंता निर्माण करणारे प्रश्न पुणेकरांसाठी उपस्थित झाले आहेत आणि त्यांचा उहापोह करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आज पुण्यात ज्या प्रकारे गुंडांचं जे काही […]
ADVERTISEMENT

पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या सुटकेनंतर जी मिरवणूक काढण्यात आली आणि ज्या पद्धतीने त्याच्या समर्थकांनी पुण्यापर्यंत जो धुडगूस घातला या सगळ्याच गोष्ट अशोभनीय अशाच आहेत. पण यामुळे काही महत्त्वाचे आणि अत्यंत चिंता निर्माण करणारे प्रश्न पुणेकरांसाठी उपस्थित झाले आहेत आणि त्यांचा उहापोह करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आज पुण्यात ज्या प्रकारे गुंडांचं जे काही उदात्तीकरण होत आहे किंवा त्यांची जी क्रेझ वाढत आहे त्यामुळे पुणे आणि त्याच्या आसपासच्या अनेक ग्रामीण भागातील तरुण हे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. ही गोष्ट गजानन मारणेच्या मिरवणुकीवरुन स्पष्ट देखील झाली आहे. पुण्यातील तरुणांना गुन्हेगारांचं आकर्षण का वाटू लागलं आहे? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
-
जमिनींना आला सोन्याचा भाव
खरं तर पुणे हे विद्येचं माहेरघर अशीच त्याची ओळख होती. पण पुणे, जवळील उपनगरांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने विकासाची गंगा वेगाने आली त्यामुळे येथील आर्थिक परिस्थिती खूप वेगाने बदलत गेली. पुण्याच्या जवळपासचे ग्रामीण भाग हे आता आयटी आणि औद्योगिक हब बनले आहेत. यामुळे येथील जमिनींना सोन्याचा भाव आला आहे. यामुळे येथील तरुणांच्या हातात मोठ्या प्रमाणात पैसा आला आणि हीच गोष्ट आता येथील वाढत्या गुन्हेगारीला देखील कारण असल्याचं दिसून येत आहे.
-
गुंडांकडील ब्रँडेड वस्तू ते आलिशान गाड्यांची भुरळ