143 वर्षांपूर्वी मोरबीच्या राजाने बनवला होता केबल ब्रिज; जाणून घ्या काळ बनलेल्या मोरबी पुलाचा इतिहास

मुंबई तक

गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळला आणि अनेकांसाठी मृत्यूचा ‘काळ’ बनला. मोरबीची शान म्हटला जाणारा केबल ब्रिज 143 वर्षांचा होता, जो रविवारी 30 ऑक्टोबर 2022 रोजी अपघाताचा बळी ठरला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मोरबी ब्रिज स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीश राजवटीत बांधण्यात आला होता. मच्छू नदीवर बांधलेला हा पूल मोरबीचे प्रमुख पर्यटन स्थळ होते. मोरबीचा केबल पूल […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळला आणि अनेकांसाठी मृत्यूचा ‘काळ’ बनला. मोरबीची शान म्हटला जाणारा केबल ब्रिज 143 वर्षांचा होता, जो रविवारी 30 ऑक्टोबर 2022 रोजी अपघाताचा बळी ठरला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मोरबी ब्रिज स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीश राजवटीत बांधण्यात आला होता. मच्छू नदीवर बांधलेला हा पूल मोरबीचे प्रमुख पर्यटन स्थळ होते.

मोरबीचा केबल पूल कधी बांधला गेला?

केबल ब्रिज (स्विंगिंग ब्रिज) मोरबीचे राजा वाघजी राव यांनी बांधला होता. ज्याचे उद्घाटन 1879 मध्ये झाले. ब्रिटीश अभियंत्यांनी बांधलेल्या या पुलाच्या बांधकामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. ब्रिटीश राजवटीत बांधलेला हा पूल उत्तम अभियांत्रिकीचा प्रतिक ठरला आहे. राजकोट जिल्ह्यापासून ६४ किमी अंतरावर मच्छू नदीवर बांधलेला हा पूल लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. ७६५ फूट लांब आणि ४ फूट रुंद असलेला हा पूल ऐतिहासिक असल्यामुळे गुजरात पर्यटनाच्या यादीतही समाविष्ट झाला होता.

मोरबी पूल हे अभियांत्रिकीचे जिवंत उदाहरण होते

ब्रिटीश अभियंत्यांनी बांधलेला हा पूल प्रगत अभियांत्रिकीचे जिवंत उदाहरण मानले जात होते. गुजरात राज्यातील मोरबी जिल्हा मच्छू नदीच्या काठावर वसलेला आहे. त्याच नदीवर मोरबी केबल ब्रिज बांधण्यात आला. मोरबीचा राजा प्रजावत्सल्य वाघजी ठाकोर याच्या काळात हा पूल बांधण्यात आला होता. राजा राजवाड्यातून मोरबी पुलावरून राजदरबारात जात असे असे म्हणतात.

दुरुस्तीनंतर पूल पुन्हा खुला करण्यात आला

पुलाच्या देखभालीची जबाबदारी ओरेवा ग्रुपकडे आहे. या गटाने मार्च २०२२ ते मार्च २०३७ या १५ वर्षांसाठी मोरबी नगरपालिकेशी करार केला आहे. हा पूल पाच दिवसांपूर्वी दुरुस्तीनंतर जनतेसाठी खुला करण्यात आला. पुलावर क्षमतेपेक्षा जास्त लोक उपस्थित होते, त्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp