लतादीदींनी गायलेल्या पहिल्या गाण्याला 80 वर्षे पूर्ण, स्वरसम्राज्ञीच्या शिरपेचात मानाचा तुरा!

मुंबई तक

भारताची गानकोकिळा कोण? हा प्रश्न विचारला तर कुणीही सांगेल की त्यांचं नाव आहे लता मंगेशकर. लता मंगेशकर यांनी आजच्याच दिवशी म्हणजेच 16 डिसेंबर 1941 ला रेडिओसाठी दोन गाणी म्हटलं होती. लता मंगेशकर यांनी ट्विट करून यासंदर्भातली माहिती दिली आहे. काय म्हणाल्या आहेत लता मंगेशकर? ’16 डिसेंबर 1941 हाच तो दिवस होता ज्या दिवशी मी माझ्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

भारताची गानकोकिळा कोण? हा प्रश्न विचारला तर कुणीही सांगेल की त्यांचं नाव आहे लता मंगेशकर. लता मंगेशकर यांनी आजच्याच दिवशी म्हणजेच 16 डिसेंबर 1941 ला रेडिओसाठी दोन गाणी म्हटलं होती. लता मंगेशकर यांनी ट्विट करून यासंदर्भातली माहिती दिली आहे.

काय म्हणाल्या आहेत लता मंगेशकर?

’16 डिसेंबर 1941 हाच तो दिवस होता ज्या दिवशी मी माझ्या माईचा आणि बाबांचा आशीर्वाद घेऊन रेडिओसाठी स्टुडिओत जाऊन दोन गाणी म्हटली होती. आज या गोष्टीला 80 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 80 वर्षांमध्ये मला जनतेचं जे अतूट प्रेम आणि आशीर्वाद मिळाला तो मला गौरव वाटतो. मला खात्री आहे तुमचं प्रेम आणि आशीर्वाद मला असंच मिळत राहिल.’ या आशयाचं ट्विट लता मंगेशकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून केलं आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गेल्या 8 दशकांहून जास्त काळ रसिक गाणं हेच आपलं सर्वस्व मानलं. लता मंगेशकर यांनी गायलेली गाणी आजही रसिकांच्या मनात रुंजी घालणारी आहेत. लता मंगेशकरांना गानकोकिळा, गासम्राज्ञी म्हटलं जातं ते त्यांच्या या अविरत सेवेसाठीच. हिंदी, मराठी गाणी म्हणत त्यांनी कलेची साधना केली आहे. आज त्यांच्या या कला साधनेच्या पहिल्या पुष्पाला म्हणजेच त्यांच्या पहिल्या गाण्याला 80 वर्षे पूर्ण झाली आहेत.

हे वाचलं का?