Savarkar: सावरकर हे मुस्लिमांचे शत्रू नव्हते, त्यांनी तर…: मोहन भागवत

मुंबई तक

नवी दिल्ली: ‘वीर सावरकर (Veer Savarkar) हे मुस्लिमांचे कधीही शत्रू नव्हते. एवढंच नव्हे तर त्यांनी उर्दूमध्ये गझलही लिहली होती.’ असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी सावकरांवरील एका पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमात म्हटलं. उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांच्या ‘वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नवी दिल्ली: ‘वीर सावरकर (Veer Savarkar) हे मुस्लिमांचे कधीही शत्रू नव्हते. एवढंच नव्हे तर त्यांनी उर्दूमध्ये गझलही लिहली होती.’ असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी सावकरांवरील एका पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमात म्हटलं. उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांच्या ‘वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

‘स्वातंत्र्यापासून वीर सावरकरांविषयी लोकांमध्ये माहितीचा अभाव आहे. पण आता लोकांना या पुस्तकाद्वारे वीर सावरकरांबाबत बरीच माहिती मिळेल आणि ते सावरकरांना जाणून घेऊ शकतील. याशिवाय स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती, योगी अरविंद यासारख्या दिग्गजांबाबत देखील योग्य माहिती लोकांना उपलब्ध करून देण्यात येईल.’ असंही भागवत यावेळी म्हणाले.

पाहा नेमकं काय म्हणाले मोहन भागवत

‘सावरकरांना बदनाम करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. स्वातंत्र्यानंतर ही मोहीम खूप वेगाने वाढली. सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकर यांना सातत्याने लक्ष्य केलं आहे. सध्या सावरकरांचे हिंदुत्व, विवेकानंदांचे हिंदुत्व असे वर्णन करणे ही आता एक फॅशन आहे. हिंदुत्व एक होते, आहे आणि शेवटपर्यंत एक राहील.’ असंही मोहन भागवत यावेळी म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp