Maharashtra Political Crisis : ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे घमासान; पुन्हा पुढची तारीख
हरिष साळवे यांचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने पुढील तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी होळीच्या सुट्टीनंतर सुरुच राहणार आहे. आता मंगळवारी पुढील सुनावणी होणार आहे. अजून दोन दिवस ही सुनावणी चालणार आहे. त्यादरम्यान शिवसेना आणि ठाकरे गटाचे वकील युक्तिवाद करणार आहेत. सर्व घटना घडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यानंतरच सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदे […]

ADVERTISEMENT
हरिष साळवे यांचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने पुढील तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी होळीच्या सुट्टीनंतर सुरुच राहणार आहे. आता मंगळवारी पुढील सुनावणी होणार आहे. अजून दोन दिवस ही सुनावणी चालणार आहे. त्यादरम्यान शिवसेना आणि ठाकरे गटाचे वकील युक्तिवाद करणार आहेत.
सर्व घटना घडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यानंतरच सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट घ्यायला सांगितले, ठाकरे बहुमत चाचणीला समोरे गेले नाहीत – हरिश साळवे यांचा युक्तिवाद
दोन स्वतंत्र बैठका आहेत. कृपया एका मीटिंगचे मिनिट्स दुसर्यात मिसळून गोंधळ करुन घेऊ नका – कौल यांची विनंती.
जर सरकारला बहुमत गमवावे लागले आणि एक गट येऊन म्हणतो की आमच्याकडे बहुमत आहे, तर शिंदे गटाला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी बोलावून राज्यपालांनी कोणती चूक केली? कौल यांचा सवाल.