Bangladesh protest : शेख हसीनांना देशातून पळायला लावणारं प्रकरण काय?

मुंबई तक

Why bangladesh protest : बांगलादेशात हिंसेचा आगडोंब उसळला. आंदोलकांनी राजधानी ढाक्यात अक्षरशः हैदोस घातला. नेमका कोणत्या मुद्द्यावरून बांगलादेशात अस्थिरता निर्माण झाली?

ADVERTISEMENT

google news

Sheikh Hasina News : बांगलादेशात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. हे सगळं घडलं ते आरक्षण या मुद्द्यामुळे. सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आणि बांगलादेशात दोन महिन्यात सगळी उलथापालथ झाली. (Reason behind bangladesh protest in Marathi) 5 जून ते 5 ऑगस्ट 2024 या दोन महिन्यांच्या काळात बांगलादेशात अभूतपूर्व उलथापालथ झाली. रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांनी शेख हसीना यांना पंतप्रधान पदावरून पायउतार केले. इतकंच नाही, तर त्यांना बांगलादेशही सोडावा लागला. शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. पण, बांगलादेशात आरक्षणाचा मुद्दा इतका का पेटला आहे. बांगलादेशात आरक्षण पद्धत काय आहे, तिथल्या विद्यार्थ्यांचा त्याला इतका विरोध का आहे. हेच सगळं य व्हिडीओतून समजून घ्या...