विराटने टेस्टचं कर्णधार पद सोडल्यानंतर जय शाह, राहुल गांधींनी दिली प्रतिक्रिया म्हणाले….

मुंबई तक

विराट कोहलीने आज टेस्ट क्रिकेटचं कर्णधारपद सोडलं आहे. त्याचा हा निर्णय अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये त्याने T20 चं कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर आता त्याने टेस्ट क्रिकेटचं कर्णधारपदही सोडलं आहे. दक्षिण अफ्रिकेतील मालिका पराभवानंतर विराट कोहलीने मोठा निर्णय घेतला आहे. शनिवारी संध्याकाळी विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडलं असल्याची घोषणा केली आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

विराट कोहलीने आज टेस्ट क्रिकेटचं कर्णधारपद सोडलं आहे. त्याचा हा निर्णय अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये त्याने T20 चं कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर आता त्याने टेस्ट क्रिकेटचं कर्णधारपदही सोडलं आहे.

दक्षिण अफ्रिकेतील मालिका पराभवानंतर विराट कोहलीने मोठा निर्णय घेतला आहे. शनिवारी संध्याकाळी विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडलं असल्याची घोषणा केली आहे. विराट कोहलीने ट्विटरवर एक मेसेज शेअर करून याची घोषणा केली आहे.

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात BCCI चे अध्यक्ष जय शाह, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

BCCIने विराट कोहलीला दिल्या शुभेच्छा

हे वाचलं का?

    follow whatsapp