काँग्रेसच्या निर्णयाचे अधिकार दिल्लीतून नागपूर-भंडाऱ्यात कधी आले? शरद पवारांचा नाना पटोलेंना टोला

मुंबई तक

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसच्या निर्णयाचे अधिकार दिल्लीला होते ते नागपूर भंडाऱ्यात कधी आले? असा टोला लगावत शरद पवारांनी नाना पटोलेंची खिल्ली उडवली आहे. नाना पटोले स्वबळाचा नारा देऊ शकतात, आम्ही तसं बोलू शकत नाही. कारण आम्हाला सरकार आणि संघटनाही चालवायची आहे असंही […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसच्या निर्णयाचे अधिकार दिल्लीला होते ते नागपूर भंडाऱ्यात कधी आले? असा टोला लगावत शरद पवारांनी नाना पटोलेंची खिल्ली उडवली आहे. नाना पटोले स्वबळाचा नारा देऊ शकतात, आम्ही तसं बोलू शकत नाही. कारण आम्हाला सरकार आणि संघटनाही चालवायची आहे असंही पवारांनी म्हटलं आहे. गडचिरोलीत पत्रकारांशी बोलत असताना शरद पवार यांनी हा टोला लगावला आहे

आणखी काय म्हणाले शरद पवार?

शरद पवारांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. सरकारने संवादातून मार्ग काढावा अशीही सूचना त्यांनी केली. प्रसंगी आम्ही मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. विलिनीकरण अशक्य असल्याचे अप्रत्यक्ष संकेत त्यांनी दिले. एसटी कर्मचारी संघटनांनी आडमुठेपणाचा मार्ग सोडावा असे आवाहन करत सरकारशी चर्चा करताना मान्यताप्राप्त संघटनांशी चर्चा करता येते मात्र जमावाशी नाही हे त्यांनी लक्षात आणून दिले.

केंद्र सरकारवरही टीका

हे वाचलं का?

    follow whatsapp