अहमदनगर-आष्टी रेल्वे प्रवाशांविना ओस : गाडीत रोज हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच प्रवासी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रोहित वाळके, अहमदनगर :

कोट्यावधी रूपये खर्च करून सुरू केलेली अहमदनगर-आष्टी रेल्वे अवघ्या आठवड्याभरातच प्रवाशांविना ओस पडल्याचे चित्र आहे. 700 वाहन क्षमता असलेल्या गाडीत रोज केवळ 60 ते 70 प्रवासीच प्रवास करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे केवळ राजकीय दबावापोटी ही तोट्यातील रेल्वे सुरू केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

400 रुपये कमाईवर 4 लाख खर्च :

जागरूक विचार मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून अहमदनगर-पुणे अशी शटल सुरू करण्याची आमची मागणी आहे. पण केवळ राजकीय दबावापोटी अहमदनगर-आष्टी रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. अहमदनगर-आष्टीला प्राधान्य दिल्याने आम्ही माहिती घेतली असता रोज या गाडीने पाच ते दहा लोकचं नगर ते आष्टी आणि आष्टी ते नगर असा प्रवास करत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे 40 रूपये तिकीट आहे तर रेल्वेला 400 रूपये मिळतात. पण रेल्वेचे सेवेवर चार लाख रूपये खर्च होतात, त्यामुळे ही न पटणारी गोष्ट आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गाडी पुण्यापर्यंत विस्तारण्याची मागणी :

अहमदनगरच्या हजारो लोकांची मागणी आहे की अहमदनगर-पुणे शटल सुरू झाली पाहिजे. अहमदनगर स्टेशनवर टर्मिनल नसल्याने नवीन गाडी सुरू करायला अडचण आहे. आता नवीन गाडी सुरू झाल्याने सर्व व्यवस्था आहे. अहमदनगर-आष्टी गाडी मोकळी पळविण्यापेक्षा ती गाडी आष्टी – अहमदनगर – पुणे अशी चालली तर अहमदनगरवरून पुण्याला जाणाऱ्या हजारो लोकांची सोय होऊ शकेल. शिवाय ट्राफिक जाम आणि इंधनावर खर्च होणाऱ्या हजारो रूपयांच्या इंधनाचा चुराडाही वाचेल. त्यामुळे आमची मागणी रास्त आहे, असेही मुळे म्हणाले.

आष्टीला रात्री मुक्कामी आल्यास गाडीला फायदा होवू शकतो :

रेल्वे प्रवासी अरुण साठे म्हणाले, अहमदनगर-आष्टी रेल्वे सकाळी 7:45 ला अहमदनगरवरून आष्टीसाठी रवाना होते. तर सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी आष्टीमध्ये पोहचते. त्यानंतर दुसरीकडे ही रेल्वे सकाळी 11 वाजता आष्टीवरून सुटून दुपारी 1 वाजून 55 मिनिटांनी पुन्हा अहमदनगरला पोहोचते. मात्र आष्टीवरुन 11:30 ला अहमदनगरला परत येत असल्याने शेतकरी व्यापारी व नोकदारांना याचा फायदा मिळत नाही. जर रात्री मुक्कामी ही गाडी आष्टीला आली तर शेतकरी, व्यापारी रात्री गाडीत माल भरुन तो सकाळी लवकर अहमदनगरला आणू शकतात.

ADVERTISEMENT

त्याचबरोबर पुण्याला जाणाऱ्या प्रवाश्यांनाही अहमदनगरमधून पुण्याला जाण्यासाठी सकाळच्या वेळेमध्ये गाडी उपलब्ध होईल. त्यामुळे रेल्वेचे उत्पन्न वाढु शकते. सध्या गाडीत प्रवास करणारे फक्त 60/70 लोकच असतात, ते पण मजेसाठी आलेले असतात. पण दिवाळीच्या सुट्टीत आजुन वाढ होईल, परंतू रोज प्रवास करणारे प्रवासी सध्या नसल्याने रेल्वेला लाखो रूपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचेही साठे यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

प्रवासी श्रीकांत घायतडक म्हणाले, आष्टीतील लोकांना बीड दूर पडतो. तर अहमदनगर जवळ आहे. त्यामुळे अहमदनगरला एक तरी नागरिक खरेदी किंवा इतर कारणास्तव जात असतो. रेल्वे तालुक्यात आल्याने त्याचा फायदा सर्व गोरगरीब जनतेला होईल. आज गाडी मोकळी असली तरी हळूहळू संख्या वाढेल आणि याचा रेल्वे प्रशासनाला फायदा होणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT