Andheri By Poll : ऋतुजा लटकेंचा राजीनामा स्वीकारण्याचे कोर्टाचे आदेश, अनिल परब म्हणाले..

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Andheri By Poll : ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्याचा पेच अखेर सुटला आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत मुंबई महापालिका आयुक्तांनी ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करावा असे आदेश बॉम्बे हायकोर्टाने दिले आहेत. ज्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते अनिल परब यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

काय म्हटलं आहे अनिल परब यांनी?

ऋतुजा लटके या विधवा झाल्या आहेत. रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांचा आधार हरपला आहे. अशी व्यक्ती जेव्हा पोटनिवडणुकीत उतरते त्यावेळी जे काही राजकारण केलं गेलं ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही. उलट जेव्हा एखाद्या ठिकाणी उमेदवाराचा मृत्यू होतो त्यानंतर पोटनिवडणूक झाली तर ती बिनविरोध होते. ३ तारखेला राजीनामा दिल्यानंतरही ऋतुजा लटकेंवर १२ तारखेला भ्रष्टाचाराचे आरोप आहेत असं सांगण्यात आलं. हे राजकारण नेमकं कोणत्या दिशेने चाललं आहे? असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्राचं राजकारण आजही खालच्या थराला गेलेलं नाही

महाराष्ट्राचं राजकारण आजही खालच्या थराला गेलंय असं मी म्हणणार नाही. पण जे काही चाललं आहे ते चांगलं चाललेलं नाही. एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला आणि पोटनिवडणूक झाली तर घरचा सदस्य उभं असेल तर बिनविरोध निवडणूक होणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे. आता त्यांनी मोठं मन दाखवावं ही निवडणूक बिनविरोध केली तर महाराष्ट्रात संस्कृती आहे असं लोकांना वाटेल असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT