अंधेरी पोटनिवडणूक : ऋतुजा लटकेंच्या विजयाचा मार्ग सुकर होणार? शेलार-फडणवीसांमध्ये मध्यरात्री चर्चा

मुंबई तक

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेली निवडणूक बिनविरोध करण्याच्या मागणीनंतर मध्यरात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्यात नेत्यांमध्ये चर्चा झाली. भाजप निवडणुकीतून माघार घेऊ शकतं, अशी शक्यता फडणवीस-शेलार यांच्या भेटीमुळे व्यक्त केली जात आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं राजकीय घडामोडींना वेग आलाय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ऋतुजा लटकेंना पाठिंबा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेली निवडणूक बिनविरोध करण्याच्या मागणीनंतर मध्यरात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्यात नेत्यांमध्ये चर्चा झाली. भाजप निवडणुकीतून माघार घेऊ शकतं, अशी शक्यता फडणवीस-शेलार यांच्या भेटीमुळे व्यक्त केली जात आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं राजकीय घडामोडींना वेग आलाय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ऋतुजा लटकेंना पाठिंबा जाहीर करत अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती फडणवीसांना केली. त्यानंतर शरद पवारांनीही हीच भूमिक मांडली. शिंदे गटातले आमदार प्रताप सरनाईकांनी अशीच भूमिका घेत शिंदेंना पत्र लिहिलंय. त्यामुळे भाजप निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता बळावली आहे. भाजपनं माघार घेतल्यासं ऋतुजा लटकेंच्या विजयाचा मार्ग सुकर होईल.

अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक प्रचाराच्या सुरूवातीलाच रंगतदार अवस्थेत पोहोचलीये. अंधेरीची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनवल्यानंतर भाजपकडून उमेदवार मागे घेतला जाण्याची शक्यता निर्माण झालीये. त्याला कारण ठरलं रविवारी समोर आलेल्या भूमिका.

अंधेरी पोटनिवडणूक : भाजपवर माघार घेणार? प्रताप सरनाईकांनी एकनाथ शिंदेंना लिहिलं पत्र

हे वाचलं का?

    follow whatsapp