उद्धव ठाकरेंचा राजीनामा! राज्यात आता शिंदे-फडणवीसांचं सरकार; एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना

मुंबई तक

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देताच राज्यात भाजपचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेविरोधात बंडखोरी केलेल्या आमदारांना सोबत घेऊन भाजप सरकार स्थापन करण्याच्या तयारीला लागलीये. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याबद्दल मौन बाळगलेल्या एकनाथ शिंदेंनी नवं सरकार आणि मंत्रिपदाबद्दल भाष्य केलंय. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार बुधवारी रात्रीच कोसळलं. उद्धव […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देताच राज्यात भाजपचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेविरोधात बंडखोरी केलेल्या आमदारांना सोबत घेऊन भाजप सरकार स्थापन करण्याच्या तयारीला लागलीये. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याबद्दल मौन बाळगलेल्या एकनाथ शिंदेंनी नवं सरकार आणि मंत्रिपदाबद्दल भाष्य केलंय.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार बुधवारी रात्रीच कोसळलं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाबरोबरच विधान परिषद सदस्यत्वही सोडलं. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपनं सत्ता स्थापनेची तयारी सुरू केलीये. शिंदे गट आणि भाजपत आधीच मंत्रिपदाचं वाटप झाल्याचंही समोर येतंय, पण यावर शिंदेंनी खुलासा करत वृत्त फेटाळलं आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षाचं महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर शिंदे यांनी सकाळी १० वाजता दोन ट्विट केले आहेत. या दोन ट्विटमध्ये शिंदे यांनी मंत्रिपदाच्या वाटपाबद्दल सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे भाजपसोबत सरकार स्थापन करत असल्याचंही त्यांच्या ट्विटमधून स्पष्ट झालं आहे.

“उद्धव ठाकरेंनी हे आधीच सांगितलं असतं, तर बाहेरून पाठिंबा देण्याची आमची तयारी होती”

हे वाचलं का?

    follow whatsapp