Rajya Sabha Election : ‘आमचं नशीब की, संजय राऊत काठावर वाचले; भुजबळांनी बोलून दाखवली भीती

मुंबई तक

सहा जागांसाठी झालेल्या राज्यसभा निवडणुकीचे निकाल खरंच अभ्यासाचा विषय बनले आहेत. चारही उमेदवार विजयी होतील, असा आत्मविश्वास असलेल्या महाविकास आघाडीला प्रत्यक्ष निकालानंतर झटका बसला. शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाल्यानं बरीच चर्चा रंगली आहे. या निकालाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही भाष्य केलं आहे. महाविकास आघाडीकडून प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), इम्रान प्रतापगडी (काँग्रेस), संजय राऊत आणि […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

सहा जागांसाठी झालेल्या राज्यसभा निवडणुकीचे निकाल खरंच अभ्यासाचा विषय बनले आहेत. चारही उमेदवार विजयी होतील, असा आत्मविश्वास असलेल्या महाविकास आघाडीला प्रत्यक्ष निकालानंतर झटका बसला. शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाल्यानं बरीच चर्चा रंगली आहे. या निकालाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही भाष्य केलं आहे.

महाविकास आघाडीकडून प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), इम्रान प्रतापगडी (काँग्रेस), संजय राऊत आणि संजय पवार (शिवसेना) यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपकडून केंद्रीय मंत्री पियूष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांनी उमेदवारी देण्यात आली होती.

“संजय राऊत ब्रम्हदेव आहेत का?”; अपक्ष आमदारांचा संजय राऊतांवर पलटवार

या निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाल्यानं महाविकास आघाडीला झटका बसला आहे. या निकालानंतर शिवसेनेनं काही अपक्षांची नावं घेत दगाबाजी केल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या आरोपाबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले, “अपक्षांना दुखावण्यापेक्षा पुढच्या कामासाठी आणखी जवळ कसं करता येईल, यासाठी प्रयत्न करायला हवं असं मला वाटतं,” अशी भूमिका भुजबळांनी सध्या सुरू असलेल्या वादंगावर मांडली.

हे वाचलं का?

    follow whatsapp