“मुख्यमंत्री स्वतःसाठी ११ वेळा दिल्लीला गेले, एकदा महाराष्ट्रासाठी..” फॉक्सकॉनवरून आदित्य ठाकरे आक्रमक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःसाठी ११ वेळा दिल्लीला गेले होते. माझं त्यांना आवाहन आहे एकदा तरी महाराष्ट्रासाठी दिल्लीत जा आणि फॉक्सकॉनचा प्रकल्प वाचवा असं शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली. दापोलीमधल्या सभेत आदित्य ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे.

फॉक्सकॉन प्रोजेक्टबद्दल सुभाष देसाई खोटं बोलताहेत का? व्हायरल बातमीमागचं सत्य काय?

फॉक्सकॉनवरून काय म्हणाले आदित्य ठाकरे?

महाराष्ट्रात रोजगाराच्या १ लाख संधी निर्माण करणारा फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. यामुळे महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं आहे. महाराष्ट्रात एक लाख संधी निर्माण झाल्या असत्या, मात्र हा प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यापाठोपाठ रोहा या ठिकाणी येणारा बल्क डकचा प्रकल्पही गुजरातला गेला आहे. खोके सरकार गणेश उत्सवात व्यस्त असल्याने त्यांना महाराष्ट्राकडे पाहण्यासाठी वेळ नाही अशीही खोचक टीका आदित्य ठाकरेंनी केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदेंना उद्देशून काय म्हणाले आदित्य ठाकरे?

मला एक प्रश्न पडलाय की हे खोके सरकार चाललंय तरी कसं? दोन प्रकल्प महाराष्ट्रातून निघून गेले आहेत पहिला प्रकल्प आहे वेदांता फॉक्सकॉन हे तुम्हाला माहित आहे. मात्र मुख्यमंत्र्यांना आणि उद्योग मंत्र्यांना माहित नाही. आज मी संवाद साधतो आहे त्याचं कारण हेच आहे की जे काही राज्यात सुरू आहे ते मला पटत नाही.

हे सरकार पडणार म्हणजे पडणारच

गद्दारी करून हे सरकार आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे, बेईमानी करून आलं आहे त्यामुळे हे पडणार म्हणजे पडणारच. ज्या वेदांता फॉक्सकॉनसाठी मी आणि सुभाष देसाई यांनी प्रयत्न केले तो प्रकल्प आपल्या हातातून गेला. जानेवारी ते जूनपर्यंत आम्ही चर्चा करत होतो. अनिल अग्रवाल यांना आम्ही मुंबईत भेटलो, दावोसला भेटलो. १०० टक्के महाराष्ट्रात फॉक्सकॉन येणार होतं. महाराष्ट्रात १ लाख रोजगार निर्माण होणार होते. मात्र ४० गद्दारांनी सरकार पाडलं. त्यानंतरही आम्ही टीका केली नाही आम्हाला वाटलं हे प्रकल्प आणतील. मात्र यांनी म्हणावे तसे प्रयत्न झालेच नाहीत. २९ ऑगस्टला अनिल अग्रवाल यांच्याशी बैठक झाली. ५ सप्टेंबरला MoU साठी बोलावलं होतं. मात्र प्रकल्प गुजरातला गेला.

ADVERTISEMENT

प्रकल्प गुजरातला गेला नाही, ज्याचा मला राग नाही. मात्र आपल्या उद्योग मंत्र्यांना याची माहितीही नाही याचं मला जास्त वाईट वाटलं असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. बल्क ड्रग पार्कसाठी आपल्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सरकारने अडीच हजार कोटी बाजूला ठेवले होते. मात्र तो प्रकल्पही गुजरातला गेला. नागपूरला एक प्रकल्प होता एअरबसचा. दिवस फार कमी राहिले आहेत. स्वतःसाठी ११ वेळा मुख्यमंत्री दिल्लीत गेले. आता महाराष्ट्रासाठी तरी जा अशी माझी विनंती आहे. आता नवरात्र लवकरच सुरू होणार आहे. आपण परत एकदा व्यस्त व्हाल. दांडिया, गरबा, मंडळं अशा सगळ्या ठिकाणी तुम्ही जाणार. त्याआधी काहीतरी प्रयत्न करा असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT