सत्तासंघर्ष: सरन्यायाधीशांच्या एका प्रश्नाने शिंदेचं वाढलं टेन्शन; सरकारच धोक्यात?
Maharashtra Political Crisis arguments: नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) पेच अद्यापही कायम आहे. हा पेच सोडविण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) वेगवेगळ्या प्रकारे युक्तिवाद केला जात आहे. मात्र, असं असलं तरीही आजच्या (28 फेब्रुवारी) सुनावणीत सरन्यायाधीशांनी (CJI) विचारलेल्या प्रश्नाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचं टेन्शन फारच वाढण्याची शक्यता आहे. […]
ADVERTISEMENT

Maharashtra Political Crisis arguments: नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) पेच अद्यापही कायम आहे. हा पेच सोडविण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) वेगवेगळ्या प्रकारे युक्तिवाद केला जात आहे. मात्र, असं असलं तरीही आजच्या (28 फेब्रुवारी) सुनावणीत सरन्यायाधीशांनी (CJI) विचारलेल्या प्रश्नाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचं टेन्शन फारच वाढण्याची शक्यता आहे. (cm shindes tension increased with a question from the cji is the threat of government collapse)
‘अपात्रतेबाबतचे मुद्दे ठरवणं हे बाकी आहेत त्यावेळी राज्यपाल बहुमताची चाचणी त्याच मुद्द्यावर कशी काय करू शकतात? तसंच अपात्रतेची टांगती तलवार असतानाही आमदार मतदान कसे करु शकतात?’ असा सवाल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांना विचारला. या संपूर्णय मुद्द्यावरून कोर्टात बराच रंजक युक्तिवाद पाहायला मिळाला.
Shiv Sena: सुप्रीम कोर्टाने शिंदेंचे बांधले हात! ठाकरेंच्या आमदारांना संरक्षण
कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाच्या वतीने नीरज किशन कौल हे युक्तिवाद करताना म्हणाले की राज्यपालांची कृती ही योग्य होती. एस आर बोम्मई केस जी 1994 ची आहे ज्यामध्ये 9 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने निर्णय दिला होता. त्यात हे स्पष्ट झालं होतं की, ज्यावेळी राज्यपालांना अशा पद्धतीने जेव्हा सरकारच्या अस्थिरतेबाबत प्रश्न असतात तेव्हा ते बहुमत चाचणी घ्यायला सांगू शकतात. याच घटनेचा कौल यांनी कोर्टाला दाखला दिला.