Mumbai Tak Exclusive : तांबेंनी विश्वासघात केला, धोका दिला : पटोलेंचे आरोप

मुंबई तक

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा आहे ती नाशिक पदवीधर मतदारसंघाची. विद्यमान आमदार सुधीर तांबे यांनी पक्षाचा एबी फॉर्म मिळूनही अर्ज दाखल केला नाही. त्यांच्या जागी त्यांचेच पुत्र सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करुन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तसंच भाजपचा पाठिंबा घेणार असल्याचही त्यांनी सांगितलं. त्यानंतर तांबे पिता-पुत्रांवर कारवाई करत त्यांना पक्षातून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा आहे ती नाशिक पदवीधर मतदारसंघाची. विद्यमान आमदार सुधीर तांबे यांनी पक्षाचा एबी फॉर्म मिळूनही अर्ज दाखल केला नाही. त्यांच्या जागी त्यांचेच पुत्र सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करुन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तसंच भाजपचा पाठिंबा घेणार असल्याचही त्यांनी सांगितलं. त्यानंतर तांबे पिता-पुत्रांवर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबितही केलं.

दरम्यान, याच सर्व प्रकारावर ‘मुंबई तक’ ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसची सविस्तर आणि स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी पटोलेंनी तांबे पिता-पुत्रांवर विश्वासघात केल्याचा आणि धोका दिल्याचा आरोप केला. शिवाय या दोघांवरील कारवाईबाबतही भाष्य केलं.

काय म्हणाले नाना पटोले? वाचा सविस्तर

प्रश्न: सत्यजीत तांबेना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं. तुमची याबाबतची नेमकी बाजू काय?

नाना पटोले : महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे. महाराष्ट्र हा काँग्रेस विचारांचा आहे. एक काळ होता की, महाराष्ट्रात काँग्रेसच्या नावावर कोणीही उभं केलं तरी निवडून यायचं. अशी ती परिस्थिती होती. अनेक संस्थानिक कुटुंबीय काँग्रेससोबत जोडले गेले. त्यांनाही सत्तेत सहभागी होता आलं. मोठ्या-मोठ्या पदावर ते राहिले. काही ठिकाणी अॅडजस्टमेंटचं राजकारण झालं. त्यामुळे काँग्रेसला नुकसान झालं असेल. या सगळा अंदाज आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp