राज ठाकरेंच्या पत्रावर देवेंद्र फडणवीस म्हणतात, इतकी भाबडी अपेक्षा कशी ठेवली?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलेलं नसतं असं म्हटलं आहे. तसंच आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असंही म्हटलं आहे. त्यानंतर आता यासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. […]
ADVERTISEMENT

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलेलं नसतं असं म्हटलं आहे. तसंच आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असंही म्हटलं आहे. त्यानंतर आता यासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस? (Devendra Fadnavis)
“राज ठाकरेंनी मविआ सरकारकडून याहून वेगळी अपेक्षाच ठेवायला नको होती. एवढी भाबडी अपेक्षा कशी काय ठेवली? जे सरकार लांगुलचालन करतंय, हनुमान चालिसा म्हटल्यावर राजद्रोह लावून जेलमध्ये टाकतं त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा ठेवणं चुकीचं. या सरकारविरोधात आम्ही लढतोय, त्यांनीही लढावं” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.