Raj Thackeray: पुण्याला मेट्रोची गरजच काय?, राज ठाकरे सरकारवर कडाडले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Raj Thackeray Pune: पुणे: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज (28 डिसेंबर) पुण्यातील (Pune) एका व्याख्यानमालेत बोलताना जोरदार फटकेबाजी केली आहे. यावेळी नगररचना, शहरांची नेमकी गरज यावर बोलताना राज ठाकरेंनी पुणेकरांना बरेच चिमटे काढले मात्र, त्यासोबत राज्य सरकारचे (Govt) कानही टोचले . (does pune need metro mns chief raj thackeray strongly criticizes […]

social share
google news

Raj Thackeray Pune: पुणे: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज (28 डिसेंबर) पुण्यातील (Pune) एका व्याख्यानमालेत बोलताना जोरदार फटकेबाजी केली आहे. यावेळी नगररचना, शहरांची नेमकी गरज यावर बोलताना राज ठाकरेंनी पुणेकरांना बरेच चिमटे काढले मात्र, त्यासोबत राज्य सरकारचे (Govt) कानही टोचले . (does pune need metro mns chief raj thackeray strongly criticizes the government)

‘प्रत्येक शहराचा एक स्वभाव असतो. त्यानुसार विकासकामं झाली पाहिजे. आता पुणे आणि नागपूरचंच पाहा.. तिथलं लोकं मारली किक की निघाले… पुणेकर तर घेतला शेला अन् निघाले. म्हणजेच इथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपेक्षा लोकं स्वत:च्या वाहनांना अधिक प्राधान्य देतात. अशावेळी अशा शहरांमध्ये मेट्रोसारखी व्यवस्था काय कामाची?, इथं आपण रिकाम्या मेट्रो का पळवतोय?’ असा सवाल करत राज ठाकरे यांनी या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली. पाहा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT